मतदार फेरतपासणीत आधार, मतदार कार्ड आणि रेशन कार्ड ही वैध कागदपत्रे मानली जावीत; सर्वोच्च न्यायालयाची निवडणूक आयोगाला सूचना

मतदार फेरतपासणीत आधार, मतदार कार्ड आणि रेशन कार्ड ही वैध कागदपत्रे मानली जावीत; सर्वोच्च न्यायालयाची निवडणूक आयोगाला सूचना

बिहारमधील मतदार फेरतपासणी विशेष मोहिमेला (SIR) स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. पण विधानसभा निवडणुकीच्या काही महिन्यांपूर्वी सुरू केलेल्या प्रक्रियेच्या टायमिंगवरून प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. तसेच फेरतपासणी मोहिमेदरम्यान आधार, निवडणूक कार्ड आणि रेशन कार्ड ही वैध कागदपत्रे मानली जावीत, असे आदेश न्यायमूर्ती सुधांशू धुलिया आणि न्यायमूर्ती जॉयमल्या बागची यांच्या पीठाने निवडणूक आयोगाला दिले.

सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला आधार, मतदार कार्ड आणि रेशन कार्ड यांचा पुरावे म्हणून समावेश करण्याचे आदेश दिले. उमेदवारी अर्जात अनेक चुका आणि बेकायदेशीर गोष्टी होत असल्याचा आक्षेप यावेळी निवडणूक आयोगाने घेतला. यावर यावर न्यायालयाने आयोगाला म्हटले की, आम्ही तुम्हाला थांबवत नाही आहोत तर, आम्ही तुम्हाला कायद्यानुसार काम करण्याचा विनंती करत आहोत.

देशभरातील मतदारयाद्यांची फेरतपासणी होणार, निवडणूक आयोगाची सुप्रीम कोर्टात माहिती

निवडणूक आयोगाच्या 25 जूनच्या आदेशानुसार केलेली प्रक्रिया स्पष्टपणे कलम 21 अंतर्गत मतदार यादीची विशेष पुनरावृत्ती आहे, जी केवळ मतदारांच्या मूलभूत अधिकारांचेच उल्लंघन करत नाही तर लोकप्रतिनिधी कायदा, 1950 आणि मतदार नोंदणी नियम, 1960 च्या तरतुदींचेही उल्लंघन करतो, असे याचिकाकर्त्यांनी म्हटले. निवडणूक आयोगाच्या 25 जून निर्णयाला आव्हान देणाऱ्या अनेक याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल झाल्या आहेत. यावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. “आम्हाला निवडणूक आयोगावर शंका घेण्याचे कोणतेही कारण नाही. या प्रकरणाची सुनावणी होणे आवश्यक आहे, ती 28 जुलै रोजी सूचीबद्ध करावी. दरम्यान, निवडणूक आयोगाने मसुदा प्रकाशित करू नये. तसेच निवडणूक आयोगाने प्रतिज्ञापत्र दाखल करावे”, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले.

महाराष्ट्रात जनादेश चोरला, आता बिहारची पाळी, राहुल गांधींचा भाजप आणि निवडणूक आयोगावर हल्लाबोल

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

घरात ढेकूण झाले तर काय करावे? हे करून पहा घरात ढेकूण झाले तर काय करावे? हे करून पहा
घरात ढेपूण झाले तर काही सोपे घरगुती उपाय आहेत. सर्वात आधी चादरी, उशाचे कव्हर, पडद्यासह अन्य कपडे गरम पाण्याने धुवा....
मंत्रालयात सिलिंग कोसळले
वाहनांच्या काचेला क्रॅश पडला तर… काय करायचं?
महाराष्ट्रात माय मराठीची गळचेपी सुरूच, ‘हिंदी’साठी मराठी चित्रपटाला स्क्रीन नाकारली
माघी उत्सवातील बाप्पांचे 2 ऑगस्टला विसर्जन! सहा महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर विघ्न दूर
विद्यापीठाच्या जागेवरील एसआरएला स्थगिती
साक्षीदार फोडण्यासाठी गुन्हेगारांना वेळ मिळावा म्हणून खटले मुद्दाम लांबवले जात आहेत, हाच ‘गेम प्लान’ बनलाय! सर्वोच्च न्यायालयाला चिंता