‘…तर निवडणूक बॅलेट पेपरवर घेऊ’, निवडणूक आयोगाची महत्त्वाची माहिती

‘…तर निवडणूक बॅलेट पेपरवर घेऊ’, निवडणूक आयोगाची महत्त्वाची माहिती

राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी आतापर्यंत राज्यातील कोणत्या मतदारसंघात किती उमेदवारांनी अर्ज भरला आहे, निवडणूक आयोगाची तयारी कशी सुरु आहे, तसेच आचारसंहिता भंग करणाऱ्यांवर कशी कारवाई केली जात आहे? याबाबत सविस्तर माहिती दिली. यावेळी एस. चोक्कलिंगम यांना मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाविषयी प्रश्न विचारण्यात आला. मनोज जरांगे यांच्या समर्थक आंदोलकांकडून मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन प्रत्येक मतदारसंघात शेकडो जणांकडून उमेदवारी अर्ज भरणार असल्याचा दावा केला जातोय. असं झाल्यास निवडणूक आयोगावर ताण पडू शकतो का? असा प्रश्न मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना विचारण्यात आला. त्यावर त्यांनी सविस्तर प्रतिक्रिया दिली.

“कुठल्याही परिस्थितीत आम्ही इलेक्शनचं काम पूर्ण करु. EVM ची कपॅसिटी 300 उमेदवारांची आहे. 300च्या वर जर उमेदवार गेले तर बॅलेट पेपरवर निवडणुका घेणार”, अशी भूमिका मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी मांडली. “पहिल्या टप्प्यात 19 एप्रिलला निवडणुका पार पडणार आहे. यासाठी 20 मार्चला अर्ज घेण्यास सुरुवात झालीय. तर अर्ज मागे घेण्याची तारीख 30 मार्च आहे. आतापर्यंत रामटेक – 1 , भंडारा-गोंदिया 2, गडचिरोली-चिमूर – 2, चंद्रपूर – 0 इतके अर्ज प्राप्त झाले आहेत. वर्किंग डेस कमी आहेत, त्यामुळे ते बघून अर्ज करावे. 17 मार्च ते 22 मार्च या एका आठवड्यात 1 लाख 84 हजार नवीन मतदारांची नोंदणी झालीय. आणखी मुदत बाकी आहे. लवकरात लवकर नवीन मतदारांनी नोंदणी करा”, असं आवाहन त्यांनी केलं.

आतापर्यंत किती जणांवर कारवाई?

“आतापर्यंत 308 बिना परवान्याच्या शस्त्रास्त्रे जप्त केले आहेत. राज्यात 77 हजार 148 परवाने दिले गेले आहेत. त्यातील 45 हजार 755 शस्त्रास्त्रे ताब्यात घेण्यात आलीय. 13 हजार इसमांवर कारवाई करण्यात आलीय. मतदानाच्या दिवशी पेड हॉलिडे द्यावी. मतदानाच्या दिवशी dry day जाहीर झालाय. 85 वर्षांवरील नागरिकांना गृह मतदानाची सुविधा असेल”, अशी माहिती एस. चोक्कलिंगम यांनी दिली.

कारवाईतून किती पैसे जप्त?

“आचारसंहिता सुरु झाल्यापासून आतापर्यंच कोट्यवधी रुपये विविध कारवाईतून जप्त करण्यात आले आहेत. यामध्ये मुंबई उपनगरातून सर्वात जास्त कॅश जप्त करण्यात आली आहे. मुंबई उपनगरातून तब्बल 3 कोटी 60 लाख रुपये रोकड जप्त करण्यात आली आहे. आचारसंहितेचा भंग करणाऱ्यांवर कारवाई सुरू आहे. जिल्हा स्तरावर कारवाई सुरू आहे. आम्ही भारतीय निवडणूक आयोगापर्यंत तक्रारी पोहोचवतोय. 98 हजार अंतर्गत पोलीस स्टेशन आहेत”, अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी दिली.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;