एक ब्लॉकबस्टर सिनेमा अन् 3 सुपरस्टार; गेल्या चार वर्षात तिघांनीही घेतला जगाचा निरोप

एक ब्लॉकबस्टर सिनेमा अन् 3 सुपरस्टार; गेल्या चार वर्षात तिघांनीही घेतला जगाचा निरोप

बाॅलीवूडमधील बहुतांशी ब्लाॅकबस्टर सिनेमांशी निगडीत काही योगायोगाच्या कथा असतात. अनेक नामांकित कलाकारांनी फारच कमी वयामध्ये सिनेसृष्टीला रामराम केला. यापैकी काहींचे आजारपणामुळे तर काहींचे अकाली निधन झाले. या घटनांमुळे सिनेसृष्टीसह त्यांच्या चाहत्यांनाही मोठा धक्का बसला आहे. अशा घटनामध्ये वाढ झाल्यामुळे, बॉलीवूडला एकप्रकारे ग्रहणच लागलं आहे, असे बोलणे वावगे ठरणार नाही. 36 वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या एका चित्रपटातील तीन सुपरस्टार अभिनेत्यांनी असाच जगाचा निरोप घेतला होता.

दिवगंत चित्रपट निर्माते यशराज चोपडा यांचा सुप्रसिद्ध चित्रपट ‘चांदणी’ 1989 मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने आणि त्यातील संगिताने प्रेक्षकांना वेड लावलं होतं. या चित्रपटात विनोद खन्ना, ऋषी कपूर आणि श्रीदेवी यांनी मुख्य भूमिका साकारल्या होत्या. या तिन्ही सुपरस्टार अभिनेत्यांनी या जगाचा निरोप घेतला.

कर्करोगामुळे 2017 मध्ये विनोद खन्ना, 2018 मध्ये श्रीदेवी आणि कोरोना काळात 2020 मध्ये ऋषी कपूर यांचे निधन झाले. तर 2012 मध्ये चित्रपटाचे निर्माते यश चोपडा यांनीही वयाच्या 70 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. आपल्या अभिनयातून प्रेक्षकांचे मन जिंकणाऱ्या या अभिनेत्यांच्या अशा जाण्याने सर्वांनाच धक्का बसला होता.

‘चांदणी’ या चित्रपटाने ब्लाॅकबस्टर कमाई केली. आजही या चित्रपटाचा चाहतावर्ग तितक्याच आवडीने चित्रपट पुन्हा पुन्हा बघतो. त्यामुळेच कल्ट फिल्म फेस्टिव्हलमध्ये या चित्रपटाची वर्णी लागली. चांदनीचे बजेट 12.8 कोटी रुपये होते, या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 17.2 कोटी रुपये कमावले होते.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

हॉस्पिटल बिल भरताना नेहमी काय चेक केलं पाहिजे? तुमची कशी फसवणूक करतात त्यासाठी हे वाचा हॉस्पिटल बिल भरताना नेहमी काय चेक केलं पाहिजे? तुमची कशी फसवणूक करतात त्यासाठी हे वाचा
सध्या वैद्यकीय खर्च दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. हॉस्पिटलमध्ये दाखल झाल्यानंतर उपचारांपेक्षा जास्त चिंता अंतिम बिलाच्या रकमेची वाटते. अनेकवेळा हॉस्पिटलमधून डिस्चार्ज...
लाडक्या बहिणी निघाल्या सरकारी कर्मचारी; 2,289 महिलांना योजनेतून वगळले, आदिती तटकरेंची माहिती
Kolhapur News – संतापजनक! भरपावसात रुग्णालयाबाहेर मृतदेह उघड्यावरच; वैद्यकीय शिक्षण मंत्री-आरोग्यमंत्र्यांच्या जिल्ह्यातच धक्कादायक प्रकार
Ratnagiri News – रत्नदुर्ग किल्ल्यावरील घटना प्रेमप्रकरणातूनच; हरियाणावरून आलेल्या वडिलांनी मुलीची चप्पल, जॅकेट ओळखले
Pandharpur Wari 2025 – माउलींच्या पालखीचे नेत्रदीपक रिंगण आणि बंधू भेट, संतांच्या पालख्यांचा पंढरपूर तालुक्यात प्रवेश
शिवसेना-मनसेच्या मुंबईतील विजयी मेळाव्याला शरद पवार यांचा पाठिंबा
तुम्हीपण तुमच्या मुलांना केचपसोबत चपाती-पराठा देता का? नुकसान माहितीये का?