लष्करानं देश हातात घेऊ द्यायचा नसेल तर… शरद पवार यांचा इशारा काय?

लष्करानं देश हातात घेऊ द्यायचा नसेल तर… शरद पवार यांचा इशारा काय?

देशात मोदींना विरोध करणाऱ्यांना तुरुंगात घातले जात आहे. झारखंडच्या मुख्यमंत्र्यांना तुरुंगात घातले. आता केजरीवाल यांना अटक केली आहे. एक सामान्य तरुण दिल्लीचा मुख्यमंत्री झाला. चांगले राज्य करणाऱ्यांना आत टाकले जात आहे. भाजपाचा कर्नाटकातील मंत्री म्हणत होता संविधान बदलण्यासाठी सत्ता हवी आहे. लोकशाही या देशासाठी महत्वाची आहे. सामान्य माणसांच्या अधिकाराचे रक्षण संविधान करते. घटनेच्या अधिकारांची पायमल्ली केली की तेथे हुकुमशाही येते. बांग्लादेशात लष्करानं देश हातात घेतला, पाकिस्तानात लष्कराने देश हातात घेतला. लष्कराने देश हातात घेऊ द्यायचा नसेल तर संविधानाचे रक्षण करणे महत्वाचे असल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज येथे केले. बारामती येथील शेतकरी कामगार मेळाव्यात ते बोलत होते.

गेली दहा वर्षे मी संसदेत तुमच्यावतीने काम करीत आहे. मोदीचं संसदेवर किती लक्ष आहे हे सांगितले तर तुम्हाला आश्चर्य वाटेल. मोदींनी संसदेत जाताना साष्टांग नमस्कार घातला होता. मागचं अधिवेशन एक महिन्याचे होते. मोदी किती वेळा आले, पंतप्रधान मोदी एकदाच आले आणि काही बोलून निघून गेले. यावरून त्यांचा संसदीय लोकशाहीवर किती विश्वास हे त्यांनी दाखवलं असे शरद पवार यावेळी आपल्या भाषणात म्हणाले. भाजपाचे कर्नाटकातील खासदार म्हणाले की या देशाची घटना बदलायची आहे. या देशाची घटना तुमचा अधिकार आहे. आज लोकशाही संकटात येत आहे. या निवडणुकीत आपण यांना रोखलं पाहीजे असेही पवार यांनी यावेळी सांगितले.

हे परिवर्तन आपल्याला चालू ठेवायचे आहे

बारामतीत एमआयडीसी केली, कारखाने आम्ही आणले. कारखानाचे कसे आणायचे असा प्रश्न होता. पर्यावरणात नुकसान होतील असं कारखाने येऊ द्यायचे नाही असे ठरविले. दुधाच्या सोसायट्या आम्ही काढल्या. दुधावर प्रक्रिया करण्यासाठी काय करता येईल हे पाहिलं. दूधाच्या भूकटी पासून आपण चॉकलेट केलं. इंग्लंडला, दुबईतून चॉकलेट खरेदी करता ते बारामतीची चॉकेलेट असतात. तुम्ही तयार केलेला माल परदेशात जातो. मुंबईला त्यांच्या कंपन्या आहेत. बारामती शैक्षणिक केंद्र झाले आहे. मुलींना शिक्षण मिळाले. दुसरी गोष्ट हाताला काम मिळाले आहे. मुली शिकल्या तर घर सुधारते. शारदा संकुलात हजारो मुली शिकतात. सोलापूर, माढा अनेक जिल्ह्यातील मुली येथे शिकतात. मुलीचं सरक्षण केलं जातं. हे परिवर्तन आपल्याला चालू ठेवायचं असल्याचे शरद पवार यांनी यावेळी सांगितले.

 

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;