पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूरवरुन संजय राऊत यांनी नरेंद्र मोदी यांना घेरले

पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूरवरुन संजय राऊत यांनी नरेंद्र मोदी यांना घेरले

शिवसेना उबाठा नेते आणि खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली आहे. पहलगाम हल्ल्यातील दहशतवादी अजूनही मिळाले नाही. दुसरीकडे ऑपरेशन सिंदूरवरुन राजकारण केले जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी कोणालाच विश्वासात घेत नाहीत, असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे.

नीती आयोगाची बैठक रविवारी झाली. त्यावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करताना संजय राऊत म्हणाले, स्वतः पंतप्रधान टीम इंडिया म्हणून काम करत नाहीत. ते भारताला विश्वासात घेत नाहीत. भाजपशासित राज्यातील मुख्यमंत्र्यांनाही विश्वासात घेत नाहीत. प्रमुख विरोधी पक्षनेत्यांनाही विश्वासात घेत नाहीत. आता तर त्यांनी पहलगाम हल्ल्याचे राजकारण सुरू केले. नीती आयोगाच्या बैठकीत सुद्धा ऑपरेशन सिंदूरबद्दल चर्चा होते. दुसरीकडे आम्हाला पहेलगाम हल्ल्याचे राजकारण करू नका, असा सल्ला देतात. मोदी यांचे लष्करी गणवेशातील होर्डिंग, फोटो वापरुन राजकारण होत आहे, असा आरोप राऊत यांनी केला.

पहलगाम हल्ला करणारे दहशतवादी गायब झाले आहे. त्यांचा शोध लागला नाही. अमेरिकन अध्यक्षच्या दबावाखाली शस्त्रसंधी करण्यात आली. यापूर्वी घडलेल्या पुलवामा घटनेतील दहशतवादीसुद्धा सापडले नाही. परंतु त्या घटनेचे राजकारण केले गेले. आता पहलगाममध्ये देखील असेच घडले आहे. त्याच्यामागे देखील राजकारण किंवा कारस्थान आहे, असा संशय असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले.

तुम्ही तिन्ही सेनादलांना या युद्धातून माघार घेण्यास भाग पाडले. युद्ध जिंकत असताना माघार घेतली गेली. तुम्ही आमच्या २६ महिलांच्या कुंकवाचा अपमान करत आहात. या प्रकरणात अमित शाह यांचा राजीनामा मागायला हवा. त्यांच्या अपयशामुळेच ही वेळ आली आहे, असा आरोप राऊत यांनी अमित शाह यांच्यावर केला.

राज ठाकरेंसोबत युती होणारच

राज ठाकरे यांच्या युतीसंदर्भात बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, उद्धव ठाकरे यांनी स्वतः सांगितले आहे. आम्ही मतभेद संपवून टाकणार आहोत. त्यानंतर आदित्य ठाकरे हे देखील म्हणतात की, आम्ही युतीसाठी तयार आहोत. महाराष्ट्र आणि मराठी माणूस संकटात आहे. प्रत्येक क्षेत्रातील मराठी माणसाला वाटले पाहिजे की मराठी माणूस एकत्र यायला पाहिजे. आम्ही भूतकाळात डोकावत नाहीत. काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा भूतकाळ आमच्या सोबत चांगला नव्हता. पण आम्ही सरकार चालवले. भविष्याच्या विचार करत आम्ही एकत्र आलो. राज ठाकरे आणि यांच्या पक्षानेही भूतकाळातून बाहेर येणे आणि भविष्याचा विचार करणे गरजेचे आहे. आम्ही त्या दृष्टिकोनातून पाऊले टाकली आहेत, असे राऊत सांगितले.

दोन्ही भाऊ एकत्र येत असतील तर त्याचे स्वागतच आहे, असे भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटले. त्यावर बोलताना संजय राऊत म्हणाले, सुधीर मुनगंटीवार एक प्रगल्भ राजकारणी आहेत. सुधीरभाऊ यांनी मनाची इच्छा व्यक्त केली. प्रत्येक मराठी माणसाची तीच भावना आहे. आमच्या पक्षांमध्ये या विषयावर मतभेद नाही. आम्हाला सकारात्मक पावले टाकायची आहे, असे संजय राऊत यांनी म्हटले.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;