Operation Sindoor- हिंदुस्थानने मिराज, JF-17 सह पाकिस्तानची 5 लढाऊ विमानं पाडली

Operation Sindoor- हिंदुस्थानने मिराज, JF-17 सह पाकिस्तानची 5 लढाऊ विमानं पाडली

हिंदुस्थानच्या ऑपरेशन सिंदूरमुळे पाकिस्तानला खूप नुकसान झाले आहे. असे असले तरीही पाकिस्तान मात्र जगभर खोट्या बातम्या पसरवण्यात मग्न आहे. हिंदुस्थानी सैन्याने पाकिस्तानला प्रत्युत्तर देताना त्यांची 5 विमाने पाडली. यामध्ये 2 लढाऊ विमानांचाही समावेश होता. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर, हिंदुस्थानने ऑपरेशन सिंदूरद्वारे पाकिस्तान आणि पीओकेमधील 9 दहशतवादी तळांवर हल्ला केला होता. सैन्याने 6 आणि 7 मे रोजी दोन पाकिस्तानी लढाऊ विमाने पाडली. यानंतर,8 आणि 9 मे रोजी 3 विमाने पाडण्यात आली. हिंदुस्थानने पाकिस्तानचे 2 जेएफ 17, 1 मिराज जेट, 1 अवाक आणि 1 सी-130 पाडले पण पाकिस्तान अजूनही जगभरात खोट्या बातम्या पसरवत आहे.

पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री इशाक दार यांनी अलिकडेच त्यांच्या संसदेत पाकिस्तानी हवाई दलाचे खोटे कौतुक केले होते. त्यांनी म्हटले होते की, द टेलिग्राफने पाकिस्तान हवाई दलाचे कौतुक करणारा लेख प्रकाशित केला आहे. तर ही बातमी खोटी असल्याचे निष्पन्न झाले. पाकिस्तानच्या द डॉन वृत्तपत्राने त्याची सत्यता पडताळून ती खोटी असल्याचे घोषित केले होते. इशाक दार म्हणतात की पाकिस्तानने 6 हिंदुस्थानची विमाने पाडली होती.

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर, हिंदुस्थानने ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून दहशतवाद्यांच्या तळांवर हल्ला केला, परंतु पाकिस्तानी सैन्यानेही त्यात उडी घेतली. हिंदुस्थानी सैन्याने पाकिस्तानी सैन्यावर गोळीबार केला आणि त्यांचे मोठे नुकसान केले. प्रत्युत्तरादाखल पाकिस्तानी हवाई दलाचे 5 जवान मारले गेले. यामध्ये स्क्वॉड्रन लीडर उस्मान युसूफचाही समावेश होता. पाकिस्तानी लष्कराच्या एका निवृत्त एअर मार्शलनेही नुकसानीचा खुलासा केला. ते म्हणाले की, हिंदुस्थानने खूप नुकसान केले आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

फडणवीससाहेब, भांडणातून लक्ष बाहेर काढा आणि महाराष्ट्राच्या जनतेकडे लक्ष द्या – आदित्य ठाकरे फडणवीससाहेब, भांडणातून लक्ष बाहेर काढा आणि महाराष्ट्राच्या जनतेकडे लक्ष द्या – आदित्य ठाकरे
छत्रपती संभाजीनगर शहरात भयंकर पाणीटंचाई निर्माण झाली आहे. शहराला बारा ते पंधरा दिवसांनी पाणी मिळत आहे. महापालिका प्रशासनाच्या या तुघलकी...
Thane News – कल्याणमध्ये मद्यधुंद चालकाची 6 ते 7 वाहनांना धडक, एक जण गंभीर जखमी
Operation Sindoor चा राजकीय फायदा घेण्याचा पंतप्रधान मोदींचा प्रयत्न; काँग्रेसचा केंद्रावर निशाणा
एजाज खानला न्यायालयाचा दणका, बलात्कार प्रकरणात अटकपूर्व जामीन फेटाळला
Rohit Sharma Stand – शरद पवारांसोबत माझं नाव दिसतंय…; रोहित शर्माने व्यक्त केल्या भावना
गुजरात समाचारचे मालक बाहुबली शाह यांना ईडीने घेतले ताब्यात
सुरक्षा दलाच्या छावणीवर वीज कोसळली, सीआरपीएफच्या एका जवानाचा मृत्यू; तीन जण गंभीर जखमी