एजाज खानला न्यायालयाचा दणका, बलात्कार प्रकरणात अटकपूर्व जामीन फेटाळला

एजाज खानला न्यायालयाचा दणका, बलात्कार प्रकरणात अटकपूर्व जामीन फेटाळला

लग्नाचे आमिष दाखवून अभिनेत्रीवर बलात्कार केल्याप्रकरणी अभिनेता एजाज खानला दिंडोशी न्यायालयाने दणका दिला आहे. दिंडोशी न्यायालयाने एजाज खानचा अटकपूर्व जामीन गुरुवारी फेटाळला. प्रकरणाची गंभीरता लक्षात घेता एजाज खानची कोठडीत चौकशी होणे आवश्यक असल्याचे न्यायमूर्ती दत्ता ढोबळे म्हणाले.

एका रिअ‍ॅलिटी शो चा होस्ट आणि सेलिब्रेटी असल्याचा फायदा घेत एजाज खानने पीडित अभिनेत्रीला विश्वास घेतले. यानंतर लग्नाचे आमिष दाखवून आणि आर्थिक आणि व्यावसायिक मदतीचे आश्वासन देऊन एजाज खानने अनेक वेळा तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले. अभिनेत्रीच्या फिर्यादीनंतर एजाजविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या अंतर्गत बलात्कार आणि फसवणूक करून संबंध ठेवल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, दोघांमध्ये सहमतीने शरीरसंबंध झाल्याचा दावा एजाज खानच्या वकिलांनी केला आहे. वकिलांनी न्यायालयाला काही व्हॉट्सअॅप चॅट्स आणि ऑडिओ रेकॉर्डिंग्जही दाखवल्या, ज्यात पीडितेवर खटला मागे घेण्यासाठी पैसे मागितल्याचा आरोप आहे.

मोबाईल फोन जप्त करण्यासाठी, चॅट्स तपासण्यासाठी आणि वैद्यकीय तपासणीसाठी एजाजची कोठडीत चौकशी आवश्यक असल्याचे सरकारी वकिलांनी न्यायालयाला सांगितले. तसेच, एजाजचा गुन्हेगारी रेकॉर्ड असून तो पुराव्यांशी छेडछाड करू शकतो, असा दावाही सरकारी वकिलांनी केला. एफआयआरमध्ये तारीख, ठिकाण आणि घटना स्पष्टपणे नमूद केल्या आहेत आणि हा केवळ संमतीने झालेल्या संबंधाचा खटला असल्याचे दिसत नाही. त्यामुळे एजाज खानचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळण्यात येत आहे, असे न्यायालयाने स्पष्ट केले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

काकडी सोलून खाणे योग्य आहे की नाही, जाणून घ्या तज्ज्ञांचे मत काकडी सोलून खाणे योग्य आहे की नाही, जाणून घ्या तज्ज्ञांचे मत
उन्हाळा सुरू झाला की आपण आपल्या आहारात थंड पदार्थ समाविष्ट करत असतो. त्यात पाण्याची कमतरता या दिवसांमध्ये जाणवू नये यासाठी...
Ratnagiri News – रत्नागिरीत अवकाळी पाऊस, राजापुरात वीज पडून दोन कामगार जखमी
नवी मुंबईत मिंधे पुत्राच्या कार्यक्रमात भाडोत्री कार्यकर्त्यांचा गोंधळ, सातशे रुपये ठरवले पण एक पैसाही दिला नाही
फडणवीससाहेब, भांडणातून लक्ष बाहेर काढा आणि महाराष्ट्राच्या जनतेकडे लक्ष द्या – आदित्य ठाकरे
Thane News – कल्याणमध्ये मद्यधुंद चालकाची 6 ते 7 वाहनांना धडक, एक जण गंभीर जखमी
Operation Sindoor चा राजकीय फायदा घेण्याचा पंतप्रधान मोदींचा प्रयत्न; काँग्रेसचा केंद्रावर निशाणा
एजाज खानला न्यायालयाचा दणका, बलात्कार प्रकरणात अटकपूर्व जामीन फेटाळला