राजकारण्यांनी आमच्या भावनांशी खेळू नये! संतोष जगदाळेंच्या पत्नीची विनवणी

राजकारण्यांनी आमच्या भावनांशी खेळू नये! संतोष जगदाळेंच्या पत्नीची विनवणी

दहशतवाद काय असतो, हे आम्ही आमच्या डोळ्यांनी पाहिले आणि सोसले आहे. त्यामुळे माझे राजकारण्यांना सांगणे आहे की, आमच्या भावनांशी खेळू नका, आम्ही कुठल्या मानसिकतेतून जात आहोत याचा माणुसकी म्हणून विचार करा. कुणीही आम्हाला खोटे पाडू नका, अशी विनवणी दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झालेल्या संतोष जगदाळे यांच्या पत्नी प्रगती जगदाळे यांनी माध्यमांशी बोलताना केली.

प्रगती जगदाळे म्हणाल्या, स्टेटमेंट करणे सोपे आहे. राजकारण्यांना आम्ही आपले मानतो. त्यांनी तरी असे करू नये. मी अजूनही त्या धक्क्यातच आहे. डोळे बंद केले तरीही रायफल घेतलेला माणूस दिसतो. आठ दिवस झाले मी झोपले नाही. या दुर्घटनेमुळे आमचे जे नुकसान झाले, ते कोणीही भरून काढू शकत नाही. माझी सगळ्यांनाच विनंती आहे. आमच्या भावनांचे राजकारण करू नये. आमचे दु:ख रंगवून सांगू नका. आमचा माणूस आमच्यासमोर मारला आहे. दहशतवादी मारायलाच आले होते. त्यांनी त्वेषाने बोललेली वाक्ये ऐकली आहेत.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

सैफशी घटस्फोटामुळे नाही तर ‘या’ खास व्यक्तीला गमावल्यानंतर पूर्णपणे खचली होती अमृता सैफशी घटस्फोटामुळे नाही तर ‘या’ खास व्यक्तीला गमावल्यानंतर पूर्णपणे खचली होती अमृता
बॉलिवूड इंडस्ट्रीतील काही जोडप्यांच्या घटस्फोटाची चर्चा आजसुद्धा होते. त्यापैकीच एक म्हणजे अभिनेता सैफ अली खान आणि अमृता सिंग. या दोघांनी...
“कसलाच पश्चात्ताप नाही..”; अमृताला कानाखाली वाजवल्याप्रकरणी अखेर ईशाने सोडलं मौन
मित्राला वाचवायला गेला, त्याचाच जीव गेला; आत्महत्येसाठी गेलेला मित्र रेल्वे येताच बाजूला झाला अन्…
साताऱ्यात हिवराच्या शेंगा खाल्ल्याने शाहूपुरीत 26 मेंढ्यांचा मृत्यू
पुण्यात पहारेकरी पगाराविनाच, ईगल कंपनीने साडेसहाशे सुरक्षा रक्षकांचे वेतन थकवले
भीमा नदीपात्रातून रात्रंदिवस वाळूउपसा सुरू; गढूळ पाण्यामुळे बठाण, उचेठाणच्या ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात
पुणे विमानतळावर बिबट्याचा वावर