Pahalgam Attack – संसदेत दोन्ही सभागृहांचे विशेष अधिवेशन बोलवा, राहुल गांधींचं पंतप्रधान मोदींना पत्र

Pahalgam Attack – संसदेत दोन्ही सभागृहांचे विशेष अधिवेशन बोलवा, राहुल गांधींचं पंतप्रधान मोदींना पत्र

जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 26 लोकांचा मृत्यू झाला. या 26 लोकांच्या निर्घृण हत्येमुळे संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली आहे. संपूर्ण देश आणि राजकीय पक्ष दहशतवादाविरुद्ध एकत्र आहेत. दहशतवाद्यांवर आणि त्यांचा मालक पाकिस्तानवर कठोर कारवाईची मागणी केली जात. याचदरम्यान, आता काँग्रेस पक्षाने पहलगाम हल्ल्याबाबत संसदेचे विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणी केली आहे. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणी केली आहे.

पंतप्रधान मोदींना लिहिलेल्या पत्रात राहुल गांधी म्हणाले आहेत की, “पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यामुळे प्रत्येक हिंदुस्थानी संतापला आहे. या महत्त्वाच्या वेळी हिंदुस्थानने दाखवून दिले पाहिजे की, आपण नेहमीच दहशतवादाविरुद्ध एकत्र उभे आहोत. विरोधी पक्षांना असा विश्वास आहे की, संसदेच्या दोन्ही सभागृहांचे विशेष अधिवेशन बोलावले पाहिजे, जिथे लोकप्रतिनिधी त्यांची एकता आणि दृढनिश्चय दाखवू शकतील. आमची विनंती आहे की, विशेष अधिवेशन लवकरात लवकर बोलावण्यात यावे.”

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

राजकारण्यांनी आमच्या भावनांशी खेळू नये! संतोष जगदाळेंच्या पत्नीची विनवणी राजकारण्यांनी आमच्या भावनांशी खेळू नये! संतोष जगदाळेंच्या पत्नीची विनवणी
दहशतवाद काय असतो, हे आम्ही आमच्या डोळ्यांनी पाहिले आणि सोसले आहे. त्यामुळे माझे राजकारण्यांना सांगणे आहे की, आमच्या भावनांशी खेळू...
एक रुपयात पीक विमा बंद; सुधारित योजना लागू करणार
मुंबईचे नवे पोलीस आयुक्त कोण होणार? अनेक नावे चर्चेत, डार्क हॉर्स अधिकारी मारणार बाजी
वांद्रे येथील लिंक स्क्वेअर मॉलमध्ये भीषण आग
मराठीसाठी शिवसेना आक्रमक; अरेरावी करणाऱ्या स्विगीला दाखला हिसका, मराठीद्वेष्ट्या व्हिवो कंपनीलाही इशारा
ज्येष्ठ अभिनेते-निर्माते प्रकाश भेंडे यांचे निधन
पहलगामचा बदला! लष्कराला पूर्ण स्वातंत्र्य!! पंतप्रधान मोदी म्हणाले… टाईम, टार्गेट आणि अ‍ॅटॅक कसा करायचा हे तुम्हीच ठरवा!