ठाण्यात अजब गजब… विहीर गेली चोरीला, दोषींवर कारवाई करण्याची स्थानिक नागरिकांची मागणी

ठाण्यात अजब गजब… विहीर गेली चोरीला, दोषींवर कारवाई करण्याची स्थानिक नागरिकांची मागणी

ठाण्यात अजब गजब घटना घडली असून चक्क विहीर चोरीला गेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी नौपाडा परिसरात बांधकामाच्या ठिकाणी विकासकाकडून विहीर बुजवण्यात आली असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून करण्यात आला आहे. बांधकामासाठी ही विहीर बुजवण्यात आली असून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी संतप्त नागरिकांनी केली आहे.

एकीकडे पाणीटंचाईचा सामना करावा लागत असताना दुसरीकडे बांधकामांच्या आड चक्क नैसर्गिक पाण्याचे स्रोत बुजवले जात आहेत. नौपाडा प्रभाग समिती क्षेत्रातील बाळकृष्ण हाऊसिंग सोसायटी या परिसरात बांधकाम सुरू आहे. मात्र ज्या विकासकाकडून हे बांधकाम सुरू आहे त्याने या ठिकाणी असलेली विहीर परस्पर बुजवण्यात आली असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. कोणत्याही विकासकाला परस्पर विहीर बुजवण्याचा अधिकार नाही. ही विहीर जाणीवपूर्वक बुजवून निसर्गाची हानी केली आहे असा आरोप युवासेनेचे कोलबाड विभागीय समन्वयक अक्षय करंजकर यांनी केला आहे. या ठिकाणी ठाणे महापालिकेने त्वरित पाहणी करून संबंधित विकासकाची बांधकाम परवानगी रद्द करण्यात यावी अशी लेखी तक्रार करंजकर यांनी ठाणे महापालिका प्रशासनाकडे केली आहे.

विहिरी जतन करून ठेवण्याची जबाबदारी महापालिकेची सध्या भीषण पाणीटंचाई जाणवत आहे. बहुतांश गृहसंकुलांना टँकरच्या माध्यमातून पाणीपुरवठा केला जात आहे. शहरात यापूर्वी असलेल्या अनेक विहिरी विकासकांच्या माध्यमातून बुजवण्यात आल्या आहेत. त्यामुळे उरलेल्या विहिरी जतन करून ठेवण्याची जबाबदारी महापालिकेची असून याची गांभीर्याने दखल घेण्याची मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

जमिनीच्या मोबदल्यासाठी शेतकरी आक्रमक, भर पावसात रेल्वे रुळांवर ठिय्या, अखेर प्रशासनाने उचलले पाऊल जमिनीच्या मोबदल्यासाठी शेतकरी आक्रमक, भर पावसात रेल्वे रुळांवर ठिय्या, अखेर प्रशासनाने उचलले पाऊल
सांगलीमधून मोठी बातमी समोर येत आहे. रेल्वे प्रशासनाकडून संपादित करण्यात आलेल्या जमिनीचा मोबदला मिळाला यासाठी शेतकरी आक्रमक झाले होते. बाधित...
‘मॅक्सवेलने तुझ्याशी लग्न केलं नाही का?’ चाहत्याने असा प्रश्न विचारताच प्रीती झिंटा भडकली अन्….
प्रसन्न आहात ना?…प्रेमानंद महाराजांनी विचारताच अनुष्का झाली भावूक अन् रडू लागली,पाहा व्हिडीओ
राज्यातील 8 वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या, रविंद्र शिसवे गुप्तवार्ता विभागाच्या सहआयुक्तपदी
Justice BR Gavai : महाराष्ट्राचे भूषण गवई देशाचे 52वे सरन्यायाधीश म्हणून बुधवारी घेणार शपथ
अजित पवार गटाचे आमदार किरण लहामटे यांच्या गाडीचा अपघात, ट्रकने दिली जोरदार धडक
Monsoon 2025 News : आनंदाची बातमी! मान्सून अंदमानमध्ये दाखल, महाराष्ट्रात कधी बरसणार?