POK वर कोणाचीही मध्यस्थी मंजूर नाही, हा फक्त हिंदुस्थान-पाकिस्तानचा मुद्दा आहे – परराष्ट्र मंत्रालय

POK वर कोणाचीही मध्यस्थी मंजूर नाही, हा फक्त हिंदुस्थान-पाकिस्तानचा मुद्दा आहे – परराष्ट्र मंत्रालय

आम्हाला कश्मीरवर कोणाचीही मध्यस्थी मान्य नाही. पाकिस्तानला पीओके रिकामे करावे लागेल, असं हिंदुस्थानी परराष्ट्र मंत्रालयाने म्हटलं आहे. हिंदुस्थान आणि पाकिस्तान शस्त्रसंधीनंतर आज परराष्ट्र मंत्रालयाने तिसऱ्यांदा पत्रकार परिषद घेतली. यावेळी पत्रकारांना संबोधित करताना परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी हिंदुस्थानचे पीओकेबद्दलचे धोरण स्पष्ट केले आहे. दरम्यान, दोन दिवसाआधी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हिंदुस्थान आणि पाकिस्तान पीओकेच्या मुद्द्यावर मध्यस्थी करण्याबद्दल बोलले होते. यानंतर आज हिंदुस्थानने आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

आज पत्रकारांना संबोधित करताना परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल म्हणाले की, “जम्मू-काश्मीरमध्ये तिसऱ्या पक्षाचा हस्तक्षेप मंजूर नाही. हिंदुस्थान आणि पाकिस्तानने द्विपक्षीय पद्धतीने सोडवला पाहिजे. ही आमची दीर्घकाळापासूनची राष्ट्रीय भूमिका आहे. हे धोरण बदललेले नाही. पाकिस्तनाने पीओके रिकामे करावे, असंही ते म्हणाले आहेत.

हिंदुस्थान आणि पाकिस्तान यांच्यात व्यापार थांबवण्याची धमकी देऊन शस्त्रसंधी घडवून आणण्यास मदत केल्याचा दावा डोनाल्ड ट्रम्प यांनी केला होता. या दावा हिंदुस्थानने फेटाळून लावला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या वक्तव्यावर माध्यमांच्या प्रश्नांना उत्तर देताना परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी स्पष्ट केले की, “पाकिस्तानसोबतच्या तणावादरम्यान हिंदुस्थान आणि अमेरिकेचे नेतृत्व संपर्कात होते. परंतु व्यापारावर कोणतीही चर्चा झाली नाही.”

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

जमिनीच्या मोबदल्यासाठी शेतकरी आक्रमक, भर पावसात रेल्वे रुळांवर ठिय्या, अखेर प्रशासनाने उचलले पाऊल जमिनीच्या मोबदल्यासाठी शेतकरी आक्रमक, भर पावसात रेल्वे रुळांवर ठिय्या, अखेर प्रशासनाने उचलले पाऊल
सांगलीमधून मोठी बातमी समोर येत आहे. रेल्वे प्रशासनाकडून संपादित करण्यात आलेल्या जमिनीचा मोबदला मिळाला यासाठी शेतकरी आक्रमक झाले होते. बाधित...
‘मॅक्सवेलने तुझ्याशी लग्न केलं नाही का?’ चाहत्याने असा प्रश्न विचारताच प्रीती झिंटा भडकली अन्….
प्रसन्न आहात ना?…प्रेमानंद महाराजांनी विचारताच अनुष्का झाली भावूक अन् रडू लागली,पाहा व्हिडीओ
राज्यातील 8 वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या, रविंद्र शिसवे गुप्तवार्ता विभागाच्या सहआयुक्तपदी
Justice BR Gavai : महाराष्ट्राचे भूषण गवई देशाचे 52वे सरन्यायाधीश म्हणून बुधवारी घेणार शपथ
अजित पवार गटाचे आमदार किरण लहामटे यांच्या गाडीचा अपघात, ट्रकने दिली जोरदार धडक
Monsoon 2025 News : आनंदाची बातमी! मान्सून अंदमानमध्ये दाखल, महाराष्ट्रात कधी बरसणार?