एक रुपयात पीक विमा योजनेत अनेकांनी सरकारला चुनाच लावला! योजना गुंडाळण्याचे अजित पवारांचे सूतोवाच

एक रुपयात पीक विमा योजनेत अनेकांनी सरकारला चुनाच लावला! योजना गुंडाळण्याचे अजित पवारांचे सूतोवाच

राज्यातील शेतकऱ्यांना एक रुपयात पीक विमा योजना सुरू केली. मात्र, ती योजना अडचणीत आली. ग्रामीण भागातील भाषेत सांगायचं तर अनेकांनी आम्हाला चुनाच लावला, असे खळबळजनक वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. दरम्यान, महायुती सरकारने शेतकऱ्यांची पुन्हा फसवणूक केली असून, ही योजना गुंडाळण्याचे अप्रत्यक्ष सूतोवाच अजित पवार यांनी केले आहे.

कृषी विभागाच्या वतीने ‘दिशा कृषी उन्नती’च्या कार्यशाळेचे आयोजन केले होते. यावेळी अजित पवार बोलत होते.काही योजनांमध्ये बदल करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे, असे सांगताना अजित पवार म्हणाले, यासदंर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदे, कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्यासह एक बैठक घेतली आहे. त्यामध्ये काही नवीन कल्पना अंमलात आणून एक चांगला कार्यक्रम शेतकऱ्यांसाठी देणार आहोत. आम्ही आता तुमच्या भल्याचं असेल ते करणार आहोत.

याकरिता जुन्या योजनेत काही बदल करण्यात येतील. हे बदल करताना शेतकऱ्यांना विश्वासात घेतले जाईल. मंत्रिमंडळ बैठकीत त्यासंदर्भात लवकरच निर्णय घेऊ. आम्ही शेतकऱ्यांना एक रुपयात पीक विमा देण्याची योजना सुरू केली. मात्र त्या योजनेत अनेकांनी आम्हाला चुनाच लावला. याचा सर्व तपशील काढला आहे.

कर्जमाफी नाहीच आणि एक रुपयात पीकविमाही नाही

विधानसभा निवडणुकीत शेतकऱ्यांना कर्जमाफीचे आश्वासन महायुतीने दिले होते. मात्र, गेल्या महिन्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार नाही. उलट बँकांकडून घेतलेले कर्ज मार्चअखेरपर्यंत परतफेड करा; अन्यथा व्याज सवलतही मिळणार नाही, असे जाहीरपणे सांगितले होते. आता तर एक रुपयात पीकविमा योजनाही बंद होणार याचे सूतोवाच त्यांनी केले आहे. महायुती सरकारने केलेली ही फसवणूक असल्याचा आरोप संतप्त शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे.

मिंधे गटाच्या मेळाव्यात शेतकरी संतप्त; काळे झेंडे दाखवले

कर्जमाफी न करणाख्या महायुती सरकारविरोधात शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप असल्याचे आज पुन्हा दिसले. मिंधे गटाचा शेतकरी मेळावा माढा येथे आयोजित केला होता. यावेळी पर्यटनमंत्री शंभुराज देसाई व उदय सामंत आले होते. या मेळाव्याला उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दांडी मारली. देसाई भाषणाला उभे राहताच शेतकऱ्याने कर्जमाफी झालीच पाहिजे, अशा घोषणा दिल्या. काळे झेंडे दाखवत महायुती सरकारचा निषेध केला. यामुळे मेळाव्यात खळबळ उडाली.

योजनेत बीडसह अनेक ठिकाणी मोठा गैरव्यवहार

लोकसभा आणि विधानसभा निवडणुका लक्षात घेऊन महायुती सरकारने 2023 मध्ये मोठा गाजावाजा करून एक रुपयात पीकविमा योजना आणली. त्यासाठी जाहिरातबाजी करण्यात आली. मात्र, योजनेत बीड जिह्यासह अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाल्याचे उघडकीस आले. तत्कालीन कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्यावरही भ्रष्टाचाराचे आरोप झाले होते.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

‘या’ 2 सिनेमांवर बंदी, नाहीतर सलमान खान – ऐश्वर्या राय यांचा मोठ्या पडद्यावर रंगला असता रोमान्स ‘या’ 2 सिनेमांवर बंदी, नाहीतर सलमान खान – ऐश्वर्या राय यांचा मोठ्या पडद्यावर रंगला असता रोमान्स
Salman Khan – Aishwarya Rai: अभिनेता सलमान खान आणि अभिनेत्री ऐश्वर्या राय यांच्या बद्दल काही वेगळं सांगायला नको. आजच्या घडीला...
गुडघ्यांवर पायऱ्या चढून मुंबईतील प्रसिद्ध शिव मंदिरात पोहोचली ‘ही’ मुस्लीम अभिनेत्री
आमचा युद्ध सराव झाला आहे, सुप्रीम कोर्टाच्या निकालाचं स्वागत; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर संजय राऊत यांची प्रतिक्रिया
निवडणूक आयोगाच्या आडून निवडणुका घेण्यास चालढकल करू नये, जयंत पाटील यांचा राज्य सरकारला टोला
Hair Care- निरोगी केसांसाठी जास्वंदीचे फूल आहे वरदान! वाचा सविस्तर
Pahalgam Attack च्या 3 दिवस आधीच पंतप्रधानांना मिळाली होती माहिती, म्हणून स्वतःचा दौरा रद्द केला; मल्लिकार्जुन खरगेंच्या दाव्यानं खळबळ
जम्मू कश्मीरमध्ये बस दरीत कोसळली, दोन प्रवाशांचा मृत्यू