ब्राह्मणांबद्दलच्या आक्षेपार्ह कमेंटनंतर अनुराग कश्यपला प्रसिद्ध लेखकाचं खुलं आव्हान; “जर दमच नाही तर..”

ब्राह्मणांबद्दलच्या आक्षेपार्ह कमेंटनंतर अनुराग कश्यपला प्रसिद्ध लेखकाचं खुलं आव्हान; “जर दमच नाही तर..”

दिग्दर्शक अनुराग कश्यप यांनी ब्राह्मणांबद्दल आक्षेपार्ह कमेंट करून नवा वाद ओढवून घेतला आहे. ब्राह्मणांबद्दल बोलताना त्यांची जीभ घसरली आणि त्यावरून आता अनेकांकडून त्यांच्यावर जोरदार टीका होत आहे. अशातच प्रसिद्ध लेखक मनोज मुंतशीर यांनी अनुराग यांना खुलं आव्हान दिलं आहे. इन्स्टाग्रामवर व्हिडीओ पोस्ट करत मनोज यांनी त्यांना सुनावलं आहे. “जर तुम्ही कमाई कमी असेल, तर खर्चावर लगाम लावा आणि जर तुमचं ज्ञान कमी असेल तर शब्दांवर लगाम लावा. अनुराग कश्यप– तुझी कमाई आणि ज्ञान हे दोन्ही कमी आहेत. ब्राह्मणांच्या वारशाची प्रतिमा मलिन करण्याची तुझ्यात एक इंचसुद्धा क्षमता नाही. तरीही तू इच्छा जाहीर केलीच आहेस तर मी तुझ्या घरी काही फोटो पाठवतो. त्यानंतर तू ठरव की तुला कोणावर तुझं घाणेरणं पाणी टाकायचं आहे?”, असं मुंतशीर यांनी म्हटलंय.

“आचार्य चाणक्य, चंद्रतिवारी शेखर आझाद, बाजीराव बल्लाळ, देव परशुराम, रामकृष्ण परमहंस, आदि शंकराचार्य, मंगल पांडे, अटल बिहारी वाजपेयी, तात्या टोपे, राजगुरू, रामधारी सिंह दिनकर, परम वीर कॅप्टन मनोज पांडे, बाळ गंगाधर टिळक, पंडित दिनदयाल उपाध्याय, पंडित श्रीराम शर्मा आचार्य, पंडित भीमसेन जोशी, संगीत सम्राट तानसेन, लता मंगेशकर, राणी लक्ष्मीबाई, महाकवी कालिदास, गोस्वामी तुलसीदास.. तुझ्यासारखे असंख्य द्वेष करणारे नाहीसे होतील, पण आमचा गौरवाशाली वारला संपुष्टात येणार नाही”, अशा शब्दांत त्यांनी सुनावलं आहे.

मनोज मुंतशीर यांनी अनुराग कश्यप यांना बोलण्यापूर्वी विचार करण्याचा सल्ला दिला आहे. त्यांनी म्हटलंय की जर कश्यप हे त्यांच्या शब्दांचं समर्थन करू शकत नाही, तर त्यांनी आपल्या मर्यादेत राहायला शिकलं पाहिजे आणि आपली मर्यादा ओलांडली नाही पाहिजे. ते पुढे म्हणाले, “मी तुला खुलं आव्हान देतो. मी सांगितलेल्या 21 नावांपैकी एक नाव निवड आणि मी त्यांचा फोटो तुला नक्की पाठवेन. जर तुला तुझ्या शब्दांवर टिकून राहण्याची हिंमत नसेल तर तू आपल्या मर्यादेत राहायला शिक.”

अनंत महादेवन दिग्दर्शित ‘फुले’ या चित्रपटावरून सुरू असलेल्या वादावर टिप्पणी करताना अनुराग कश्यप यांची जीभ घसरली. ब्राह्मण समुदायाबद्दल त्यांनी अत्यंत आक्षेपार्ह टिप्पणी केली होती. त्यावरून सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी प्रचंड राग व्यक्त केला. या टीकेनंतर अनुराग कश्यप यांनी सोशल मीडियावर पोस्ट लिहित जाहीर माफी मागितली. यानंतर मनोज मुंतशीर यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

विभागाचा निधी वळवला मग 100 दिवसांचा रिपोर्ट कार्ड चांगला कसा होणार? मंत्री संजय शिरसाट यांनी पुन्हा व्यक्त केली खदखद विभागाचा निधी वळवला मग 100 दिवसांचा रिपोर्ट कार्ड चांगला कसा होणार? मंत्री संजय शिरसाट यांनी पुन्हा व्यक्त केली खदखद
विधानसभा निवडणुकीच्या प्रचंड यशानंतर मुख्यमंत्री झालेले देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या मंत्र्यांचा रिपोर्ट कार्ड जारी केला. त्यामध्ये 100 दिवसांच्या कामगिरीचे मूल्यमापन...
लहानपणी आई-वडिलांचे निधन, आश्रमात मोठी झाली अभिनेत्री; मुंबईत दिग्दर्शकासोबत वाईट अनुभव
“बॉलिवूड खूप वाईट…” इरफान खानचा लेक बाबिल खान डिप्रेशनमध्ये, रडतानाचा व्हिडीओ व्हायरल
‘आश्रम 3’च्या शूटिंगदरम्यान अदिती पोहणकरच्या वडिलांचं निधन; म्हणाले “माझ्यासाठी परत येऊ नकोस.. “
हेमा मालिनी आजपर्यंत चढल्या नाहीत सवतीच्या घराची पायरी, लग्नाच्या 44 वर्षांनंतर धर्मेंद्र यांच्यापासून राहतात वेगळ्या
‘छावा’ सिनेमामुळे इतिहास कळाला हे दुर्दैव; भाजप नेत्याने व्यक्त केली खंत
शुभमन नाही, ‘या’ अभिनेत्याला डेट करतेय सारा तेंडुलकर? बिग बींच्या नातीसोबत खास कनेक्शन