।। सीतास्वरुपा ।।- आत्मसन्मानाचे रूपक

।। सीतास्वरुपा ।।- आत्मसन्मानाचे रूपक

>> वृषाली साठे

पहलगामसारख्या दुर्घटना घडल्यानंतर आजही रावण ही वृत्ती आपल्या आजूबाजूला वास्तव्यास आहे. या वृत्तीला दूर सारायचे तर आपल्यातील राम आणि सीता दोहोंनाही कायम जागृत ठेवले पाहिजे. उद्या सीतानवमी आहे. म्हणूनच या व्यक्तिमत्त्वातील सार आपण अंगिकारले पाहिजे. सीता हे केवळ नाव वा पौराणिक व्यक्ती नव्हे तर ते आत्मसन्मानाचे, स्वाभिमानाचे आणि कणखरतेचे रूपकच आहे.

सीतामाईची कहाणी आता सोमा सांगू लागते. वनवासात असताना रामजी ज्या-ज्या प्रदेशातून गेले, तेथील राक्षसांचा त्यांनी नायनाट केला. राक्षसांमुळे कोणाचा लहान मुलगा गेला होता तर कोणाचा भाऊ, कोणाची आई, तर कोणाचे बाबा गेले होते. काहीजण तर सर्वस्व हरवून बसले होते. त्या लोकांना सीतामाईंने भावनिक आधार दिला. त्यांच्यासाठी जेवण बनवून त्यांना प्रेमाने खाऊ घालायच्या. त्यांना वनऔषधींची चांगली माहिती होती. त्या औषधांचा वापर करून त्या स्वयंपाक बनवायच्या. मानसिक सामर्थ्य देऊन त्यांनी लोकांना आनंदाने जगायला शिकवले.

आजच्या काळात एखाद्या मुलीवर बलात्कार झाला, तर पोलीस, न्यायालय तिला न्याय मिळवून देते. पण तिच्या मानसिक अवस्थेचे काय? कोणीतरी प्रेमाने जवळ घेऊन दुःख हलके करायला लागतेच ना? आज जर मानसिक उपचारांची एवढी गरज आहे, तर त्या काळात राक्षसांनी केलेला विध्वंस पाहता किती भयानक काळ असावा! जंगलातील लोकांना शेती करायला सीतामाईंने शिकवले. जर कोणाला बरे नसेल तर त्या औषध द्यायच्या. शिवाय लोकतंत्र शिकवून त्यांना आत्मनिर्भर देखील करायच्या.

प्रत्येक वेळी जंगलात त्यांना खायला काही मिळेलच असे नव्हते. मिळेल त्या अन्नात ते तिघे जेवायचे व एकमेकांची खूप काळजी घ्यायचे. चित्रकूट सोडून पंचवटीला येईपर्यंत रामजी आणि लक्ष्मणजी यांनी अनेक राक्षसांना यमसदनी पाठवले. आश्रमातले ऋषी, शिष्यगण यांनादेखील निर्भय बनवून त्यांची घडी पुन्हा बसवून दिली. मिथिलेत जनकबाबांमुळे सीतामाईंना शास्त्र चर्चामध्ये खूप रस होता. त्यामुळे रामजी व सीतामाई बरोबर ऋषींच्या शास्त्रचर्चा भरपूर रंगायच्या.

रामजी आणि लक्ष्मणजी सीतामाईची खूप काळजी घ्यायचे. त्यांनी सांगितलेले औषधोपचार करायचे. सीतामाई राजमहालात जशा आनंदात  राहायच्या त्यापेक्षा जास्त आनंदात त्या जंगलातल्या पर्णकुटीत राहायच्या. रामजी आणि सीतामाई जेव्हा पंचवटीत आले, तेव्हा तिथला निसर्ग खूप सुंदर होता. तिथे त्यांची मुलगी गोदावरी नदी होती. सीतामाई जेव्हा गोदावरीच्या तीरावर येऊन बसायच्या, तेव्हा गोदावरी त्यांचे पाय धुवायची. सुंदर फुले व वनऔषधी स्वतच्या पाण्याबरोबर वाहून आणत सीतामाईंना अर्पण करायची. पण वरून सुंदर, लोभस वाटणाऱया पंचवटीत आतून काहीतरी बिनसलेले नक्कीच होते. हे दोघांनाही जाणवले होते.

ऋषी-मुनी श्रीरामांना भेटायला येत व सांगत की राक्षसराज रावण महादेवाची भक्ती करून खूप प्रबळ झाला आहे. त्याला अनेक वर मिळाले आहेत. खूप सिद्धी, मंत्र, तंत्र, विविध अस्त्र त्याच्याकडे आहेत. त्याचा तो दुरुपयोग करतो आहे. दंडकारण्याला त्याने त्याचा प्रमुख तळ बनवले आहे. इथे त्याचे प्रमुख सेनापती राहतात. ते आम्हाला खूप त्रास देतात. रावणाला उत्तरेकडे आक्रमण करायचे आहे. म्हणूनच दक्षिणेत हा तळ त्याने खूप मजबूत बनवला आहे. त्याचे सेनापती आम्हाला सतत त्रास देतात. आमच्या आश्रमाची विटंबना करतात. इतके दिवस आम्हाला अवगत असणाऱया मंत्रांनी आम्ही आमच्या आश्रमाची सुरक्षा करत होतो. पण रावणाकडे आमच्या प्रत्येक मंत्रावर प्रतिमंत्र असतो. त्यामुळे आमचे मंत्र तेवढे प्रभावी ठरत नाही. रावणाने निसर्गात केलेल्या  ढवळाढवळीमुळे काही ठिकाणी दुष्काळ पडला आहे. आम्हाला जगणे खूप कठीण होत चालले आहे. आमचे रक्षण करा. लक्ष्मणजी चिडून म्हणाले की आपण थेट रावणावर हल्ला करू. पण श्रीराम यांनी त्यांना समजावले की आपल्याकडे रावणावर हल्ला करायला ठोस कारण नाही आणि आपल्याकडे याचा पुरावाही नाही की रावण हे सर्व सेनापतींमार्फत घडवून आणत आहे. कारण रावण कुठलाच पुरावा मागे ठेवत नसे.

आजकाल आपण एखाद्या बातमीवर लगेच चिडून व्यक्त होतो. ऐकीव बातम्यांवर विश्वास ठेवतो. त्याची शहानिशा करत नाही. श्रीराम त्यांच्याकडून खूप काही शिकण्यासारखे आहे जे आपल्याला जगात वावरायला उपयोगी पडेल. ते तिघे जेव्हा अगस्त्य मुनींना भेटायला गेले तेव्हा त्यांची पत्नी महातपस्विनी लोपामुद्राने त्यांना रावणाबद्दल अधिक माहिती दिली. रावण एवढा प्रबळ झाला आहे की तो त्याच्या तपर्श्च्येच्या बळावर मिळवलेल्या शक्तीच्या सहाय्याने कोणाच्याही बुद्धीत शिरून त्यांचे विचार केवळ ओळखत नव्हता तर त्यात त्याला हवे तसे बदलही घडवून आणू शकत होता. लोपामुद्राने श्रीराम आणि सीतामाईंना काही मंत्र व मुद्रा शिकवल्या आणि सांगितले की याचा उपयोग अगदी टोकाच्या क्षणी करा. कारण हे मंत्र अतिसंहारक आहेत. तुम्ही मनाने आणि बुद्धीने खूप खंबीर आहात. हे मंत्र तुमच्या बुद्धीत शिरून वाचायला रावणाला जमणार नाही. माता अनुस्येने आपल्या पूर्ण ध्यानाचे फल सीतामाईंना दिले होते. त्यामुळे असीम शक्ती आणि सुरक्षा सीतामाईंना मिळाली. माता लोपामुद्रेने मंत्र आणि मुद्रा सीतामाईना स्वत च्या रक्षणासाठी दिल्या. श्रीरामाची बाह्य युद्धाची तर सीतामाईची आंतरिक युद्धाची तयारी होत होती. त्यांचा शेवटी सामना रावणाचा सेनापती खरदूषण याच्याशी झाला. श्रीरामांनी एकटय़ाने त्याला पराभूत केले. पण एक गोष्ट त्यांना लक्षात येते की या युद्धात वापरलेली अस्त्र-शस्त्र आधीच्या युद्धांपेक्षा खूप वेगळी आहेत. जर सेनापतीकडे अशा प्रकारची अस्त्र-शस्त्र असतील तर रावणाकडे कोणत्या प्रकारची अस्त्र-शस्त्र असतील? याबद्दल श्रीराम सजगतेने विचार करू लागले. जसजसे रावणाचे सेनापती मारले जाऊ लागले, तसतसे रावण अधिक सैन्य पंचवटीत पाठवू लागला. पंचवटीमधील वातावरण अशांत बनत चालले होते. पशुपक्षी, जीव-जंतू या सगळ्यावर यांचा परिणाम दिसत होता.

सोमा कलशातील अग्निद्वारे हे सगळे पाहू व अनुभवू शकत होती. तिला सीतामाईची खूप काळजी वाटत होती. पण सीतामाईची काळजी करणारी ती एकटीच नव्हती. अयोध्यामध्ये सर्वच स्त्रिया शरयू नदीवर पहाटे येऊन एकत्र सीतामाईच्या सुरक्षेसाठी प्रार्थना करायच्या. अगदी सीतामाई वनवासात गेल्या तेव्हापासून. महामुनी अनुसूया, लोपामुद्राचे आशीर्वाद आणि अनेक स्त्रियांच्या प्रार्थनेचे सुरक्षा कवच सीतामाईच्या भोवती होतेच. अशातच शूर्पणखेची या कथेत एन्ट्री झाली. रावणाची बहीण शूर्पणखा ही मायावी होती.

एकदा लक्ष्मणाला बरे नव्हते म्हणून सीतामाई औषधी झाडपाला शोधण्यासाठी जंगलात खूप आतपर्यंत गेल्या. औषधी घेऊन येताना त्यांना एका स्त्राrच्या रडण्याचा आवाज आला. आवाजाच्या दिशेने त्या गेल्या तेव्हा त्यांना एक स्त्राr पार्वतीमातेच्या मूर्तिसमोर बसून रडताना दिसली. सीतामाईंनी तिला रडण्याचे कारण विचारले. तेव्हा ती म्हणाली, ‘माझं नाव चंद्रिका. माझे पती योगी आहेत. आमचा एक आश्रम होता. खूप विद्यार्थी आमच्या आश्रमात शिकायचे. एकदा माया नावाची एक सुंदर स्त्राr आमच्या आश्रमात आली. तिचे वडील  मोठे योगी असल्याचे तिने आम्हाला सांगितले. तिच्या अंगाला खूप सुगंध येत होता. तिने आणलेला पक्वान्न तिने सर्व पुरुषांना खायला घालून भुलवले. एक दिवस माझे पती तिच्याबरोबर मला सोडून निघून गेले. तेव्हापासून मी अशी एकटी आहे. मला आत्महत्या करायची होती. पण पार्वती मातेने मला अडवले. मी जगून तरी काय करू? माझे माझ्या पतीवर खूप प्रेम आहे.’ ते ऐकून सीतामाई म्हणाल्या, ‘तुझा पती तुला सोडून दुसऱया स्त्राrच्या मागे गेला हे चुकीचेच आहे. पण माझ्या बाबांनी मला सांगितले होते की स्त्राrचा पहिला धर्म म्हणजे स्वतचा आत्मसन्मान राखणे. नंतर पत्नीधर्म. तू स्वत खंबीर हो. तू तुझ्या आध्यात्मिक प्रगतीकडे लक्ष दे. मी तुला श्वासावर आधारीत काही ध्यानपद्धती शिकवते.’ चंद्रिका म्हणाली, ‘हीच पद्धत माया सर्व आश्रमात वापरते. ही रावणाची बहीण शूर्पणखा आहे. हिच्यामुळे आजपर्यंत कित्येक संसार उध्वस्त झाले. कितीतरी स्त्रियांनी आत्महत्या केल्या. तिला या भागातील सर्व गुरुकुले नष्ट करायची आहेत.’ सीतामाई म्हणाल्या, ‘हिला हिच्या कर्माची फळे याच जन्मी भोगावी लागतील.’

चंद्रिकाला सांत्वना देऊन सीतामाई कुटीत परतल्या. श्रीराम व लक्ष्मणजी तिची वाटच बघत होते. जेवण झाल्यावर रामजींने सकाळी झालेली घटना सांगितली. ते शेजारच्या गावी गेले असता त्यांना नदीत एका योग्याचे शव दिसले. गावात चौकशी केल्यावर कळले की तो योगी चांगल्या चारित्र्याचा नव्हता. ते शव बाहेर काढण्यासाठी मदतीला कोणीच पुढे आले नाही. शेवटी रामजींने एकटय़ानेच ते शव बाहेर काढून त्यावर अंत्यसंस्कार केले. ‘कोण योगी होता तो माहीत नाही,’ रामजी म्हणाले.

तेव्हा सीतामाईने त्यांना चंद्रिकेची कहाणी सांगितली. रामजींनी केलेल्या वर्णनावरून सीतामाईची खात्री पटली की तो योगी चंद्रिकेचा नवरा होता. सीतामाईंना चंद्रिकेला हा समाचार कसा द्यायचा याचा प्रश्न पडला. त्या ध्यानाला बसल्या आणि त्यांच्या सूक्ष्म रूपाने चंद्रिकेजवळ गेल्या.  चंद्रिकेच्या भौतिक शरीराला सीतामाई दिसत नव्हत्या. तेव्हा तिथे माता पार्वती प्रगट झाल्या. तिने दिलेल्या दिव्य दृष्टीने चंद्रिका सीतामाईला बघू लागल्या. सीतामाईने तिला तिच्या नवऱयाच्या मृत्यूची बातमी देताच चंद्रिकेला शोक अनावर झाला. सीतामाई तिला म्हणाल्या की, ‘तुझ्या नवऱयाला शांतपणे त्याचा पुढचा प्रवास करू देत. तुझ्या शोकाने त्याला अडवू नकोस.’ यातून सीतामाई आपल्याला सांगतात की, आपली प्रिय व्यक्ती जर आपल्याला सोडून देवाघरी गेली, तर देवाकडे त्याच्या उत्तम गतीसाठी प्रार्थना करा. तुमच्या प्रेमाचे बंधन घालून त्यांची गती अडवू नका.

[email protected]

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

आपल्या बरोबरची व्यक्ती पुढे जाऊ लागली की असुरक्षित वाटतं? अशोक सराफ यांची शिकवण लक्षात ठेवा.. आपल्या बरोबरची व्यक्ती पुढे जाऊ लागली की असुरक्षित वाटतं? अशोक सराफ यांची शिकवण लक्षात ठेवा..
एखाद्या श्रेत्रात आपल्या सोबतची व्यक्ती आपल्या पुढे जाऊ लागली की काहींना असुरक्षित वाटू लागतं. मग अशातून एकमेकांविषयी ईर्षा, द्वेष आणि...
मी हिंदू, मी दलित..; पहलगाम हल्ल्यानंतर धर्माबद्दल काय म्हणाला ‘बिग बॉस 18’ फेम अभिनेता?
आईसह तुझीही कोयत्याने खांडोळी करून टाकीन म्हणत अल्पवयीन सावत्र मुलीवर अत्याचार, नराधम बाप जेरबंद
समृद्धी महामार्गावर बुलढाण्यातील कुटुंबाला लुटले! गाडीसमोर आडवी गाडी लावली 12 लाखांच्या दागिन्यांची लूट
लांड्या लबाड्या करून निवडणुका जिंकण्यासाठी लाडकी बहीण योजना आणली – संजय राऊत
12 दिवस होऊनही सरकारने पहलगाम हल्ल्याचा बदला घेतला नाही, संजय राऊत यांचा घणाघात
पाकड्यांच्या कुरापती सुरूच; सलग दहाव्या दिवशी शस्त्रसंधीचे उल्लंघन करत गोळीबार