ठाकरे बंधुंच्या युतीची चर्चा; पवार कधी एकत्र येणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या…

ठाकरे बंधुंच्या युतीची चर्चा; पवार कधी एकत्र येणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या…

राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे. मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्याशी युतीसंदर्भात मोठं वक्तव्य केलं आहे. महाराष्ट्राच्या अस्तित्वासाठी भांडणं, वाद या क्षुल्लक गोष्टी असल्याचं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे, उद्धव ठाकरे यांनी देखील राज ठाकरे यांच्या या वक्तव्याला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे भविष्यात मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाची युती होऊ शकते अशा चर्चा रंगल्या आहेत. यावर आता राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांची देखील प्रतिक्रिया दिली आहे. माझ्यासाठी ही बातमी अतिशय आनंदाची आहे, असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.

नेमकं काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?  

राज ठाकरे असं म्हणाले आमच्या वादापेक्षा महाराष्ट्रातील प्रश्न महत्त्वाचे आहेत. माझ्यासाठी ही बातमी अतिशय आनंदाची आहे. माझ्या अंगावर काटा आला. आमचे आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या कुटुंबाचे गेल्या पाच- सहा दशकांपासून कौटुंबिक संबंध आहेत. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे दोघेही आजही आमच्या कुटुंबासाठी प्रिय आहेत, बाळासाहेब आज हा दिवस बघण्यासाठी असते तर आज आम्हाला खूप आनंद झाला असता. महाराष्ट्राच्या हितासाठी आणि कुटुंबासाठी दोघे एकत्र येत असतील तर राजकीय आणि कौटुंबीक इतिहासातला हा सोनेरी दिवस आहे. दोन बंधू महाराष्ट्राच्या हितासाठी एकत्र येत असतील तर आपण त्यांचं स्वागत केलं पाहिजे, अशी प्रतिक्रिया यावर सुप्रिया सुळे यांनी दिली आहे.

दरम्यान राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे आता एकत्र येण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे पवार कुटुंब पुन्हा एकत्र येणार का? असा प्रश्नही यावेळी सुप्रिया सुळे यांना विचारण्यात आला. मात्र यावर त्यांनी बोलणं टाळलं. पांडुरंगाची इच्छा आहे, नातेसंबंध माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत, आजही आणि उद्याही, अशी प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिली.

राज ठाकरे यांनी नेमकं काय म्हटलं?

राज ठाकरे यांना शिवसेना ठाकरे गटासोबत युतीसंदर्भात प्रश्न विचारण्यात आला होता, त्याला उत्तर देताना  “या महाराष्ट्राच्या अस्तित्वासाठी, मराठी माणसाच्या अस्तित्वासाठी ही भांडणं, वाद या गोष्टी अत्यंत क्षुल्लक आहेत. एकत्र येणं, एकत्र राहणं, ही काही कठीण गोष्ट आहे, असं मला वाटत नाही”  असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;