‘मग आम्ही काय मारामाऱ्या करायच्या का?’, त्या भेटीची चर्चा अन् भुजबळ चांगलेच संतापले

‘मग आम्ही काय मारामाऱ्या करायच्या का?’, त्या भेटीची चर्चा अन् भुजबळ चांगलेच संतापले

राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे. गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे अजित पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू आहे. मात्र प्रत्येकवेळी जयंत पाटील यांनी ही शक्यता फेटाळून लावली आहे. दरम्यान आज उपमुख्यमंत्री अजित पवार आणि जयंत पाटील यांची भेट झाली. दोघांमध्ये तब्बल तीस मिनिटांपेक्षाही अधिक वेळ चर्चा झाली आहे. या भेटीनंतर पुन्हा एकदा चर्चेला उधाण आलं आहे.

बंद दाराआड चर्चा  

अजित पवार यांना भेटण्यासाठी जेव्हा जयंत पाटील हे त्यांच्या कक्षात आले, तेव्हा तिथे गर्दी होती. जयंत पाटील कक्षात येताच तिथे उपस्थित असलेल्या सर्व व्यक्तिंना बाहेर काढण्यात आले. त्यानंतर जयंत पाटील आणि अजित पवार यांच्यामध्ये बंद दाराआड जवळपास तीस मिनिटांपेक्षाही अधिक वेळ चर्चा झाली. या भेटीमुळे चर्चेला उधाण आलं आहे, या भेटीवर आता छगन भुजबळ यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.

नेमकं काय म्हणाले भुजबळ? 

आज अजित पवार आणि जयंत पाटील यांच्यामध्ये जवळपास तीस मिनिटांपेक्षा अधिक काळ चर्चा झाली. यावर आता भुजबळांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. आमची भेट रोजच होते, विधानसभेतही होते. मग आम्ही काही मारामाऱ्या करायच्या का? प्रत्येक जण विधानसभेत एकमेकांना भेटतो, हाल हवाल विचारतो. राजकारणात आम्ही विरोधी पक्षात आहोत, एकमेकांचे शत्रू नाही, असं भुजबळ यांनी म्हटलं आहे.

दरम्यान औरंगजेबच्या कबरीवरून नागपुरात मोठा राडा झाला होता. जाळपोळ आणि दगडफेकीची देखील घटना घडली, या घटनेत पोलीस देखील जखमी झाले. यावर देखील यावेळी भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पोलीस पोलिसांचं काम करत आहेत. जो चुकला असेल त्याच्यावर कायद्याप्रमाणे कारवाई होईल. सक्तीची कारवाई केली जाईल, मुख्यमंत्र्यांनी हे विधानसभेत देखील सांगितलं आहे. असं यावेळी भुजबळ यांनी म्हटलं आहे. तसेच कोरटकर वर्षावर असतील तर संजय राऊत यांनी तेथे जाऊन कोरटकरांना घेऊन यावे, असा टोलाही यावेळी भुजबळ यांनी लगावला आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;