‘ओएसडींची जशी साफसफाई केली तशी साफसफाई…,’ काय म्हणाले आनंद परांजपे

‘ओएसडींची जशी साफसफाई केली तशी साफसफाई…,’ काय म्हणाले आनंद परांजपे

होळी आधीच ठाण्यात कचऱ्याच्या प्रश्नावरून शिमगा सुरू झाला आहे. ठाणे महापालिकेच्यावतीने गेले काही दिवस घनकचरा उचलला जात नाहीए आणि कचरा उचलण्याची कोणतीही पर्यायी व्यवस्था देखील नाहीए… मागे युरोपवरून मशीन आणल्या आहेत. 1400 कोटी ठेका फडणवीस यांनी दिला होता. त्यानंतर त्याला पुन्हा तर ठेका देणार नाहीत ना असा माझा सवाल आहे. येत्या तीन दिवसात तोडगा निघाला नाही तर आम्ही पालिका मुख्यालयासमोर कचरा टाकणार आहोत असा अल्टीमेटम राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रवक्ते आनंद परांजपे यांनी ठाणे महापालिका आयुक्तांना दिला आहे.

क्लीन ठाणे योजना राबवावी

मुंब्रा विभागात अनधिकृत बांधकाम करणाऱ्यांकडून वसुली सुरू आहे.या मागे कोण याचा शोध पालिका आयुक्तांनी केबिनमधून बाहेर पडून केला पाहीजे, त्यांचे अधिकारीच वसुलीला लागले आहेत असा सनसनाटी आरोप आनंद परांजपे यांनी केला आहे. जितेंद्र आव्हाड यांनी अधिवेशनात अधिकारी यांच्या नावाने पैसे वसूल करतो असे सांगितले आहे. मुंब्रा अनधिकृत बांधकाम आणि कचरा उचलणार कोण अशी स्पर्धा लागली आहे. ओएसडींची जशी साफसफाई केली तशी साफसफाई ठाणे महापालिकामध्ये करावी असा टोला आनंद परांजपे यांनी देवेंद्र फडणवीस यांचे नाव न घेता आनंद परांजपे यांनी लगावला आहे.

लाडकी बहीण योजना निकषात बदल नाहीच

लाडकी बहीण योजनेचे महायुती सरकारने कोणतेही निकष बदलले नाहीत. या योजनेविरोधात विरोधक कोर्टात गेले होते. ही योजना कशी बंद पडेल याचे देखील स्वप्न महाविकास आघाडीने बघितले होते. भरघोस अशी तरतूद मुख्यमंत्री लाडकी बहीण त्यासाठी जिथे अर्थमंत्री अजित पवार यांनी केली आहे असेही आनंद परांजपे यांनी म्हटले आहे.एकनाथ शिंदे यांनी चालू केलेली कोणतीही योजना बंद झालेली नाही या सर्व योजना चालू राहतील असेही ते म्हणाले.

नितेश राणे यांनी जबाबदारीने बोलले पाहीजे

मंत्रीपदावर असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने जबाबदारीने भाष्य केले पाहीजे, कोणतेही वक्तव्य करताना भान ठेवला पाहिजे. आपल्या कुठल्याही वक्तव्यामुळे कुठल्याही धर्माचा आणि कुठल्याही जातीचा अपमान होता कामा नये. महाराष्ट्रामध्ये कुठल्याही प्रकारचा तणाव होणार नाही ही जाणीव मंत्रीपदावरती असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने ठेवली पाहिजे आणि ज्या विषयावरती आपल्याला संपूर्ण माहिती नाही आपण इतिहासकार नाही अशा प्रकारची वक्तव्य करणे टाळली पाहिजे असा सल्ला आनंद परांजपे यांनी नितेश राणे यांना दिला आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;