राज्यात कोंबड्यांची ‘लपवाछपवी’, तुमच्या जीवावर पडेल भारी, धाब्यावर ताव मारताना घ्या काळजी

राज्यात कोंबड्यांची ‘लपवाछपवी’, तुमच्या जीवावर पडेल भारी, धाब्यावर ताव मारताना घ्या काळजी

राज्यात अनेक भागातील शेतकरी आणि कुक्कुटपालन व्यावसायिक सध्या धास्तावले आहेत. विविध भागात बर्ड फ्लूने हातपाय पसरले आहेत. ठाण्यापासून ते चंद्रपूरपर्यंत काही जिल्ह्यात या रोगाने कहर केला आहे. त्यातच राज्यात कोंबड्या लपवण्याचा ‘रोग’ वाढल्याने पशूसंवर्धन विभाग हैराण झाला आहे. Bird Flu च्या संकटाने ग्रामीण भागात इरसाल खेळ सुरू असून काही जण कोंबड्या लपवत असल्याने धोका वाढला आहे. असे प्रकार थांबवण्याचे आवाहन पशूसंवर्धन विभागाने केला आहे. त्यामुळे धाब्यावर यथेच्छ मांसाहार झोडण्याचा बेत असेल तर काळजी घ्या.

राज्यात बर्ड फ्ल्यूचा कहर

राज्यात बर्ड फ्लूचा कहर वाढला आहे. लातूर जिल्ह्यातील एका पोल्ट्री फॉर्मवरील 4200 पिल्लं गेल्या महिन्यात अचानक दगावली होती. अहमदपूर तालुक्यातील ढालेगाव येथील पोल्ट्री फॉर्ममध्ये कोंबडीची पिल्लं मेली होती. तर त्यापूर्वी उदगीर शहरात 60 कावळ्यांचा मृत्यूची घटना समोर आली होती. बर्ड फ्लूमुळेच कावळ्यांचा मृत्यू झाल्याचे प्रयोगशाळेच्या अहवालात आले होते. तर चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपूरी तालु्क्यामधील मंगळी गावतील पोल्ट्री फॉर्मवर काही कोंबड्या दगावल्या होत्या.

वाशिमच्या कारंजा तालुक्यातील खेर्डा (जिरापुरे) येथील पोल्ट्री फार्ममधील ८ हजार कोंबड्यांपैकी ६ हजार ८३१ कोंबड्यांचा मृत्यू झाल्याची बाब समोर आली होती. राज्यात ठाणे, उस्मानाबाद, लातूर, चंद्रपूर, वाशीमसह इतर जिल्ह्यात पण ही प्रकरणं समोर आल्याने पशूसंवर्धन विभागाची झोप उडाली आहे.

प्रशासन अलर्ट मोडवर

धाराशिवमध्ये कावळ्यापाठोपाठ कोंबड्यांनाही बर्ड फ्ल्यूचा संसर्ग झाला आहे. बर्ड फ्ल्यूचा संसर्ग रोखण्यासाठी प्रशासन अलर्ट मोडवर आले आहे. ढोकी गावापासून एक किलोमीटर अंतरावरील कोंबड्या नष्ट केल्या जाणार आहेत. त्यानंतर तीन किलोमीटर परिसरातील कोंबड्याचे सॅम्पल घेतले जाणार आहेत. जलद कृती दलाच्या माध्यमातून कोंबड्या नष्ट करायला सुरुवात केली आहे.

लपवाछपवीमुळे पशूसंवर्धन विभाग हैराण

दरम्यान कोंबड्यांना बर्ड फ्लूचा धोका वाढलेला असतानाच ग्रामीण भागात कोंबड्या लपवण्याचे प्रकार वाढले आहेत. कोंबड्या नष्ट करण्याची मोहिम हाती घेतल्यापासून एकच खळबळ उडाली आहे. आपले नुकसान होईल या भीतीने काही जण या कोंबड्या लपवून ठेवत आहेत. अथवा या कोंबड्या काही काळासाठी नातेवाईक, मित्रांच्या शेतावर लपवण्यात येत असल्याचे समोर आले आहे. पण या प्रकरामुळे बर्ड फ्लूची लागण वाढण्याची भीती वाढली आहे.

अशा घटना सातत्याने वाढत असल्याने कोंबड्या लपवून ठेवू नका किंवा नातेवाईकांना देऊ नका नष्ट करायला मदत करा, असे आवाहन पशूसंवर्धन विभागाने केले आहे. कोंबड्याना संसर्ग आढळून आल्याने अनेक गावात मांस विक्रीवरही बंदी घालण्यात आली आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;