मोठी बातमी! वातावरण तापलं, धनंजय मुंडे अंजली दमानियांवर दाखल करणार फौजदारी खटला

मोठी बातमी! वातावरण तापलं, धनंजय मुंडे अंजली दमानियांवर दाखल करणार फौजदारी खटला

मोठी बातमी समोर येत आहे, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्याकडून सातत्यानं मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर आरोप करण्यात येत आहेत, या विरोधात आता मुंडे देखील चांगलेच आक्रमक झाले आहेत. त्यांनी दमानिया यांच्या विरोधात अब्रु नुकसानीचा फौजदारी खटला दाखल करण्याचा इशारा दिला आहे, याबाबत ट्विट करत त्यांनी माहिती दिली.

नेमकं काय म्हणाले मुंडे? 

‘अंजली दमानिया यांनी आज पुन्हा दिवसातून दुसऱ्यांदा पत्रकार परिषद घेत माझ्यावर खोटे व बेछूट आरोप केले आहेत. मी पुन्हा एकदा स्पष्ट करू इच्छितो की, कृषी विभागातील तत्कालीन खरेदी प्रक्रिया नियमातील तरतुदीनुसार व मा. मुख्यमंत्री महोदयांच्या अंतिम मान्यतेनंतरच झाली आहे, त्यानंतरच पुढील कार्यवाही सुरु झाली. यांसह इतर अनेक मोघम आरोप करणाऱ्या दमानिया ताई यांच्यावर मी लवकरच फौजदारी अब्रु नुकसानीचा खटला मुंबई उच्च न्यायालयात दाखल करणार आहे.’ असा इशारा यावेळी धनंजय मुंडे यांनी दिला आहे.

 

दमानियांची पहिली प्रतिक्रिया 

दरम्यान धनंजय मुंडे यांनी खटला दाखल करणार असल्याचा इशारा दिल्यानंतर आता दमानिया यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. त्यांना जर अब्रु नुकसाणीचा दावा दाखल करायचा असेल तर ते करू शकतात. मात्र खटला जर दाखल केला तर त्यांचीच अब्रु जाईल असं दमानिया यांनी म्हटलं आहे. माझ्या दुसऱ्या पत्रकार परिषदेमध्ये तर मी एक-एक मुद्दा वाचून दाखवला असंही यावेळी दमानिया यांनी म्हटलं आहे.

काय आहेत दमानिया यांचे आरोप? 

अंजली दमानिया यांनी आज पत्रकार परिषद घेतली, या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना त्यांनी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. मुंडे यांनी पत्रकार परिषद घेतली, त्यामध्ये त्यांनी मला  बदनामीया म्हटलं पण त्यांनी मला पुराविया म्हटलं असतं तरी चाललं असतं, कारण मी बदनाम लोकांचे पुरावे देत आहे. बीडमध्ये दादागिरी सुरू आहे, मामींची जमीन लाटली अशा प्रकारचे आरोप दमानिया यांनी मुंडेंवर केले आहेत.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;