Raj Thackeray : यांनी केलं तर प्रेम आणि आम्ही केला तर बलात्कार; राज ठाकरेंचा राजकीय पक्षांच्या बदलत्या भूमिकांवर जोरदार प्रहार

Raj Thackeray : यांनी केलं तर प्रेम आणि आम्ही केला तर बलात्कार; राज ठाकरेंचा राजकीय पक्षांच्या बदलत्या भूमिकांवर जोरदार प्रहार

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांन पक्षाच्या मेळाव्यात पुन्हा तुफान फटकेबाजी केली. सध्याच्या राजकारणावर त्यांनी अचूक निशाणा साधला.त्यांनी राजकीय पक्षांच्या बदलत्या भूमिकांवर जोरदार प्रहार केला. मनसेच्या भूमिकेवर कायम प्रश्नचिन्ह लावणाऱ्यांची त्यांनी चांगलीच हजेरी घेतली. त्यांच्या सूचक वक्तव्यांमुळे आगामी निवडणुकीत मनसेच्या वाटचालीवर त्यांनी प्रकाश टाकला.

यांनी केलं तर प्रेम आणि आम्ही…

शिवसेनेच्या बदलत्या राजकारणावर त्यांनी वरळी येथील मेळाव्यात प्रकाश टाकला. शिवसेनेचा जन्म झाला. १९६६मध्ये त्यांनी पहिली निवडणूक प्रजा समाजवादी सोबत लढवली. त्यानंतर मुस्लिम लीग सोबत युतीही केली होती. त्यानंतर काँग्रेसला पाठिंबा दिला. ८० मध्ये काँग्रेसही युतीही केली. नंतर भाजपसोबत गेले. त्या त्यावेळी जी परिस्थिती असते त्यानुसार पक्ष निर्णय घेतात. पण त्यांची ती बदलली ती परिस्थिती. यांचं सालं एक बरं आहे. त्यांनी केलं तर प्रेम आणि आम्ही केला तर बलात्कार, असा जोरदार पलटवार त्यांनी टीकाकारांवर केला.

चांगले त्याला चांगले म्हटले

लोकसभेत मोदींना आपण का पाठिंबा दिला याविषयी त्यांनी भूमिका स्पष्ट केली. लोकसभेत मोदी शिवतीर्थावर आले होते. त्यावेळी त्यांच्यासमोर मी म्हटलं मला ज्या ज्यावेळी बोलायचं ते बोललो. मी असं काही म्हटलं का की मी बोललो नाही. मी म्हणालोच नाही. माझं बोलून झालं. माझं सुटलं ते सुटलं. जे बोललो त्याला आधार होता. जे चांगलं कराल त्याला चांगलं म्हणू. जे वाईट त्याला वाईट म्हणू, अशी भूमिका त्यांनी यावेळी मांडली.

विरोधकांवर साधला निशाणा

यावेळी त्यांनी विरोधकांचा आणि टीकाकारांचा खरपूस समाचार घेतला. अनेकांना वाटतं राज ठाकरेंनी भाजपच्या नेत्यांना भेटलं नाही पाहिजे. भेटलं नाही पाहिजे? समोरच्याने सांगितलं चहा प्यायला ये तर काय सांगू घरीच पी. तुम्ही काय वेगळं सांगाल? मला ते भेटायला येतात तेव्हा मी तुम्हाला विकत नाही. माझा मराठीचा बाणाही बोथट करत नाही. येतात, फोन करतात, अशी भूमिका राज ठाकरे यांनी मांडली.

पराभवाने खचलो नाही, विजयाने हुरळून गेलो नाही

लहानपणापासून अनेक पराभव आणि विजय पाहिले. पराभवाने खचलो नाही आणि विजयाने हुरळून गेलो नाही. खचलेल्या पिचलेल्या लोकांचं मला नेतृत्व करायचं नाही. माझ्याबरोबर राहायचं असेल तर ठाम राहा. जे महाराष्ट्रासाठी करायचं, मराठी माणसासाठी करायचं आहे, हिंदुंसाठी करायचं ते करणारच आहोत. आज नाही, उद्या, उद्या नाही परवा. पण होणारच आहेत, असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;