बांगलादेशी नागरिकांची माहिती द्या आणि १,१११ रुपये मिळवा, कोणाचे अनोखं आवाहन

बांगलादेशी नागरिकांची माहिती द्या आणि १,१११ रुपये मिळवा, कोणाचे अनोखं आवाहन

गेल्या काही दिवसात भारतात बेकायदा वास्तव्य करणाऱ्या अनेक बांगलादेशी नागरिकांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. त्यानंतर अभिनेता सैफ अली खानवर हल्ला करणाराही बांग्लादेशी नागरिक असल्याचं समोर आलं होतं. यानंतर पोलिसांनी बांगलादेशी नागरिकांना शोधण्याची मोहीम अधिक तीव्र केली आहे. उल्हासनगर शहरात आतापर्यंत १२ बांगलादेशी नागरिकांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर आता शिवसेनेचे माजी नगरसेवक राजेंद्र सिंग भुल्लर महाराज यांनी उल्हासनगर शहरात राहणाऱ्या बांगलादेशी नागरिकांची माहिती देणाऱ्यास १ हजार १११ रुपयांचं बक्षीस जाहीर केलं आहे.. तसंच कोणत्याही व्यक्तीला आपल्याकडे कामावर ठेवण्याआधी त्याची नीट चौकशी करा असेही आवाहन व्यापाऱ्यांना बॅनरच्या माध्यमातून त्यांनी केले आहे.

नेरूळ पोलीस ॲक्शन मोडवर

नवीमुंबईतील नेरूळ पोलीस स्टेशनच्या हद्दीतील नव्या इमारतींच्या बांधकाम साईटवर काम करणाऱ्या मजूरांच्या कागदपत्रांची छाननी करुन त्यांच्यावर कारवाई करण्यात येत आहे. नेरूळमधील एका इमारतीत बांधकाम करणाऱ्या कामगारांची चौकशी सुरू असून आतापर्यंत सहा जणांना ताब्यात घेतले आहे. हे सहा जण संशयित बांगलादेशी नागरिक असल्याची प्राथमिक माहिती असल्याचे नेरुळ पोलिसांचे म्हणणे आहे. बांगलादेशी नागरिकांविरोधात नेरुळ पोलीसांनी आपली मोहिम वेगाने सुरु केली आहे.

नाशिकच्या मालेगावातील उशीला जन्म नोंदणी प्रमाणपत्र मिळविणाऱ्या २ लाख १४ हजार ३०७ अर्जांचे फॉरेन्सिक ऑडिट करावे अशी मागणी भाजपाचे माजी खासदारकिरीट सोमय्या यांनी मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे केली आहे. उशिरा जन्म नोंदणी अर्ज करणारे हे बांगलादेशी तसेच रोहींग्या असल्याचा आरोप किरीट सोमैया यांनी केला आहे. या प्रमाणपत्रासाठी लागणारे कागदपत्रे बनावट, खोटे असल्याचा दावा सोमय्या यांनी केला आहे. याची चौकशी केली तर ९० टक्के जन्म नोंदणी प्रमाणपत्र अर्ज हे रद्द होतील असाही दावा सोमय्या यांनी केला आहे.

कोल्हापूरात हिंदूत्ववादी संघटनांचे आंदोलन

महाराष्ट्रात बांगलादेशी घुसखोरांचा सुळसुळाट झाल्याने राज्याची सुरक्षा धोक्यात आली आहे. त्यामुळेच बांगलादेशी घुसखोरांविरोधात शोध मोहीम राबवा आणि घुसखोरांना सहाय्य करणाऱ्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा या मागणीसाठी कोल्हापुरात हिंदुत्ववादी संघटनांनी आंदोलन केले आहे. कोल्हापुरातल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये हिंदू राष्ट्र जागृती संघटनेने केलेल्या आंदोलनात मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले होते. यावेळी जोरदार घोषणाबाजी करून परिसर दणाणून सोडला. तर आंदोलकांच्या हातातील बांगलादेशीच्या विरोधातील फलक लक्षवेधी होते. विशेष म्हणजे यावेळी घंटानाद आंदोलन करून राज्यभर अशाच पद्धतीचे आंदोलन केले जाणार असल्याचे हिंदुराष्ट्र जागृती आंदोलन समन्वयक शिवानंद स्वामी यांनी म्हटले आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;