गेल्या पाच वर्षात मुंबईतील बेस्ट बसेसच्या ८३४ अपघात ८८ जणांचा मृत्यू

गेल्या पाच वर्षात मुंबईतील बेस्ट बसेसच्या ८३४ अपघात ८८ जणांचा मृत्यू

अलिकडे कुर्ला येथे बेस्ट अनियंत्रित झालेल्या अपघातात आठ जण ठार तर ४० जण जखमी झाल्याची घटना घडली होती. गेल्या पाचवर्षात बेस्ट ८३४ अपघात झाले असून त्यात ८८ जणांचा मृत्यू झाल्याची आकडेवारी बेस्ट दिली आहेय या प्रकरणात बेस्ट प्रशासनाने १४ कर्मचाऱ्यांना बडतर्फ तर २४ कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे. माहितीच्या अधिकारात ही माहिती बेस्ट प्रशासनाने आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांना दिली आहे.

बेस्ट प्रशासनाकडे गेल्या पाच वर्षात घडलेल्या बेस्टच्या अपघातांची , जीवितहानी आणि आर्थिक नुकसान भरपाईची माहिती मागितली होती. बेस्टचे वरिष्ठ वाहतुक अधिकारी ईगाल बेंजामिन यांनी गेल्या पाच वर्षांची सविस्तर माहिती दिली आहे, त्यानुसार गेल्याय ५ वर्षात ८३४ बेस्ट बस अपघात झाले असून यात बेस्ट आणि खाजगी कंत्राटदारांच्या बसेसचा यांचा समावेश आहे. बेस्टचे ३५२ अपघात घडले असून यात जीवितहानीची संख्या ५१ आहे तर खाजगी कंत्राटदारांच्या बसेसचे ४८२ अपघातात होऊन त्यात ३७ जणांना प्राण गमवावे लागले आहेत. वर्ष २०२२-२३आणि वर्ष २०२३-२४ मध्ये सर्वाधिक २१ जणांचा मृत्यू झाल्याचे उघडकीस आले आहे.

बेस्टच्या चुकीने झालेल्या अपघातात गेल्या पाच वर्षात मृतांच्या वारसांना आणि जखमींना ४९४ प्रकरणात बेस्टने ४२.४० कोटींची आर्थिक नुकसान भरपाई दिलेली आहे. या सर्वात जास्त रक्कम साल २०२२-२३ मध्ये सर्वाधिक १०७ प्रकरणात सर्वाधिक १२.४० कोटीची आर्थिक नुकसान दिली आहे. साल २०१९-२० मध्ये ९.५५ कोटी, साल २०२०-२१ मध्ये ३.४४ कोटी आणि साल २०२१-२२ मध्ये ९.४५ कोटी, साल २०२३-२४ मध्ये ७.५४ कोटी आर्थिक नुकसान भरपाई देण्यात आली आहे.

१२ कर्मचारी बडतर्फ, २४ कर्मचारी निलंबित

गेल्या पाच वर्षात प्राणांकीत अपघातात १२ कर्मचाऱ्यांना बडतर्फ केले असून जखमी झाल्याचा प्रकारात २ कर्मचाऱ्यांना बडतर्फ केले आहे. तर वैयक्तिक इजा प्रकरणात २४ कर्मचाऱ्यांना निलंबित केले असून काही जणांना ताकीद ,समज, दंड वसुली, श्रेणीत कपात अशा प्रकारच्या कारवाई करण्यात आली आहेत.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;