मोठी बातमी ! अजितदादा गटातही स्वबळाचे वारे…?, बड्या नेत्याचं विधान काय? महायुतीला धक्का बसणार?

मोठी बातमी ! अजितदादा गटातही स्वबळाचे वारे…?, बड्या नेत्याचं विधान काय? महायुतीला धक्का बसणार?

उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेने राज्यातील सर्व महापालिका निवडणुका स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे महाविकास आघाडीत उभी फूट पडली आहे. एकीकडे महाविकास आघाडीत या घटना घडत असतानाच अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादीतही स्वबळावर निवडणुका लढण्याचं घटत आहे. आज राष्ट्रवादीची बैठक पार पडली. यावेळी राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी स्वबळाचा नारा दिला. महापालिका स्वबळावर लढली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली. त्यामुळे राष्ट्रवादी स्वबळावर लढणार का? महाविकास आघाडीपाठोपाठ महायुतीलाही धक्का बसणार का? अशी चर्चा सुरू झाली आहे.

राष्ट्रवादीची माटुंग्यात आज बैठक होती. महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने या बैठकीचां आयोजन करण्यात आलं होतं. या बैठकीला नवाब मलिक, आमदार सना मलिक आणि सिद्धार्थ कांबळे उपस्थित होते. या शिवाय पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्तेही मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी नवाब मलिक यांनी स्वबळावर लढण्याची आग्रही मागणी धरली. राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर या मुंबईत आपण कधीच 14 पेक्षा जास्त नगरसेवक निवडून आणू शकलो नाही. एकसंघ असतानाही आपण कधीच जास्त नगरसेवक निवडून आणले नाहीत. आता पक्षाचे दोन भाग झाल्यावर कार्यकर्त्यांच्या मनात चिंता आहे. कार्यकर्ते संभ्रमित आहेत. महापालिका निवडणुकीत स्वबळावर लढायचं की महायुतीत लढायचं हा संभ्रम आहे, असं नवाब मलिक म्हणाले.

मित्र पक्ष सोबत घेईल हे विसरा

जोपर्यंत एखाद्या पक्षाची ताकद नसते तोपर्यंत त्या पक्षाला कोणीही विचारत नाही. आज मित्र पक्ष तुम्हाला सोबत घेईल हे विसरून जा. तुमची ताकद असेल तरच मित्र पक्षही तुम्हाला विचारेल. त्यामुळे तुम्हाला मुंबई महापालिकेची निवडणूक स्वबळावर लढावीच लागेल. तुम्हाला तुमची ताकद निर्माण करावीच लागेल, असं नवाब मलिक म्हणाले.

तर वेगळा ठसा निर्माण करू शकतो

नवीन लोकं जोडल्याशिवाय पक्ष वाढत नाही. तुम्हाला वाटत असेल भाजपसोबत जायचं आहे, भाजपसोबत जायचं आहे. पण भाजप परमनंट आपल्यासोबत राहील असं वाटत असेल तर हा विचार सोडून द्या. राजकारणात कोणीही कुणासोबत परमनंट राहत नाही. जो ताकदवान असतो त्याला लोकं विचारतात. ताकद नसेल तर तुम्हाला कुणी विचारणार नाही. उद्या चालते व्हा म्हणून सांगू शकतील, पण आपली ताकद असेल तर आपण स्वबळावर या मुंबईत वेगळा ठसा निर्माण करू शकतो. 14 पेक्षा जास्त नगरसेवक आले नाही, हा आपल्यावरचा ठपका आहे. आपण व्यवस्थित लढलो आणि बुथवर 100 मतांची ताकद निर्माण केली तर आपण जास्तीत जास्त नगरसेवक निवडून आणू शकतो. आपल्यावरचा ठपका आपण पुसून टाकू शकतो, असंही त्यांनी सांगितलं.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;