धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी करणारे सुरेश धस अजित पवारांच्या भेटीला

धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी करणारे सुरेश धस अजित पवारांच्या भेटीला

महाराष्ट्राच्या राजकारणात प्रचंड घडामोडी घडत आहेत. एकीकडे बीडचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणावरुन राजकारण तापलं आहे. भाजप आमदार सुरेश धस यांनी या प्रकरणावरुन मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप करत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. तर दुसरीकडे सुरेश धस यांनी आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. या भेटीत या प्रकरणावर चर्चा झाल्याची शक्यता आहे. पण सुरेश धस यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देताना या विषयावर भाष्य केलं नाही. आपण बीडमधील काही पतसंस्थांनी 16 लाख गुंतवणूकदारांचे नुकसान केले, त्यांची तक्रार करण्यासाठी आणि त्यावर मार्ग निघावा या उद्देशाने अजित पवार यांच्या भेटीसाठी आलो होते, असं सुरेश धस यांनी स्पष्ट केलं.

सुरेश धस नेमकं काय म्हणाले?

“ज्ञानराधा मल्टिस्टेट को. ऑपरेटिव्ह युनियन, तसेच परळीची एक बँक आहे, राजस्थानी मल्टिस्टेट, जिजाऊ मल्टिस्टेट आणि इतर मल्टिस्टेटमधून 16 लाख सभासद हे मराठवाड्यातील आहेत. एकट्या बीड जिल्ह्यातील सव्वा लाख सभासद आहेत. जामखेड या गावी शाखा होती. तिथलेदेखील मोठ्या प्रमाणात सभासद आहेत, ज्यांचे पैसे बुडाले आहेत. या प्रकरणात मार्ग काढला पाहिजे, केंद्र सरकारशी बोललं पाहिजे आणि एक बैठक लावली पाहिजे या मागण्या घेऊन मी इथे आलो”, असं सुरेश धस यांनी सांगितलं.

“जवळपास 26 लोकांच्या आत्महत्या या प्रकरणात झालेल्या आहेत. बीडमधील एक युवक बिंदूसरा तलावामध्ये स्वत: बळी पडला आहे. त्यामुळे या प्रकरणी तातडीने बैठक घ्यावी”, अशी विनंती करण्यासाठी अजित पवार यांच्या भेटीसाठी आलो होतो, असं सुरेश धस यांनी स्पष्ट केलं. या सर्व पतसंस्थांच्या घोटाळ्यात मंत्री धनंजय मुंडे यांचा काही सहभाग आहे का? असा प्रश्न सुरेश धस यांना पत्रकारांनी विचारला. त्यावर त्यांनी नाही असं उत्तर दिलं.

…म्हणून या भेटीला जास्त महत्त्व

सुरेश धस यांनी बीड सरपंच हत्या प्रकरणात सुरेश धस यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. तसेच विरोधी पक्षांचे नेते धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी राज्यपालांच्या भेटीला गेले तेव्हा सुरेश धस हे देखील त्यांच्यासोबत गेले होते. तसेच त्यानंतर धनंजय मुंडे यांनी काल मंत्रालयात जावून अजित पवार यांची भेट घेतली होती. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये तासभर चर्चा झाली होती. त्यानंतर लगेच रात्री अजित पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात बैठक झाली होती. या सर्व घडामोडींनंतर आता अजित पवार आणि सुरेश धस यांच्या भेटीला जास्त महत्त्व प्राप्त झालं आहे. आता ते या प्रकरणात धनंजय मुंडे यांच्यावर पुन्हा आरोप करतात का? ते पाहणं महत्त्वाचं आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;