मंत्रिमंडळ खाते वाटपावर पटोलेंची पहिली प्रतिक्रिया, महाभारताचा दाखला देत महायुतीवर थेट हल्लाबोल

मंत्रिमंडळ खाते वाटपावर पटोलेंची पहिली प्रतिक्रिया, महाभारताचा दाखला देत महायुतीवर थेट हल्लाबोल

शनिवारी मंत्र्यांना खात्याचं वाटप झालं, यावर प्रतिक्रिया देताना आता काँग्रेस नेते नाना पटोले यांनी पुन्हा एकदा महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. हे सरकार कौरवा सारखं वागत असून आपसात लढून यांचा कार्यक्रम संपणार आहे. मलाईदार जिल्हा आणि मलाईदार खात्यासाठी याची लढाई चालली आहे. जनतेच्या प्रश्नांचं यांना काही देणं-घेणं नाही. आता पालकमंत्रिपदासाठी सुद्धा यांच्यामध्ये भांडण होणार आहे, असं नाना पटोले यांनी म्हटलं आहे.

पुढे बोलताना ते म्हणाले की, हिंमत असेल तर मारकडवाडीत बॅलेटच्या माध्यमातून या सरकारने मॉकपोलिंग घेतलं पाहिजे. जनतेचं मत चोरून हे सरकार आलं आहे. निवडणूक आयोगाने जे काही नोटिफिकेशन काढलं त्यावरून असं वाटतं दाल मे कूच काला है, असा घणाघात नाना पटोले यांनी सरकारवर केला आहे.

दरम्यान काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी टीका केली होती. या टीकेला देखील यावेळी पटोले यांनी उत्तर दिलं आहे.  नौटंकी आणि हिटलरशाही या दोन शब्दाचा वापर केला पाहिजे. लोकशाहीत हुकूमशाहीचा वापर केला जात आहे. जनता रस्त्यावर येते तेव्हा कोंबिंग ऑपरेशन करून गुन्हे दाखल केले जातात. भाजप हा लोकशाहीवर विश्वास न ठेवणारा पक्ष आहे. आम्ही लोकांवर लाठीचार्ज करून, गोळ्या झाडू आणि त्यांना गुलाम बनवू असं चित्र बावनकुळे यांच्या बोलण्यातून दिसतं असं पटोले यांनी म्हटलं आहे.

मागील वेळेस 20 हजार कोटींचं बजेट अजित पवार यांनी मांडलं होतं. येणारं बजेट आणखी किती तुटीचं असणार आणि त्याचा बोजा महाराष्ट्राच्या जनतेवर पडून महागाई वाढणार आहे. हे निवडणूक आयोगाच्या कृपेने बहुमतात आले आहेत. जनतेच्या कृपेने आलेले नाहीत.   महागाई, शेतकरी यासाठी काय करणार? असा सवालही यावेळी नाना पटोले यांनी उपस्थित केला. मंत्रिमंडळ असो की वागणं दोन्ही संवेदनाहीन आहेत, या सरकारला संवेदना नाहीत असंही यावेळी पटोले यांनी म्हटलं आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;