मुंबई महापालिकेच्या निवडणुका कधी? महत्त्वाची माहिती समोर

मुंबई महापालिकेच्या निवडणुका कधी? महत्त्वाची माहिती समोर

राज्यातील विधानसभा निवडणुका पार पडल्यानंतर आता महापालिका निवडणुका कधी पार पडणार याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे. विधानसभा निवडणुकीनंतर राज्यातील महापालिका निवडणुका कधी होणार? याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. पण पुढील तीन महिने महापालिका निवडणुका होण्याची कोणतीही शक्यता नसल्याचे स्पष्ट झालं आहे. याबाबत राज्य निवडणूक आयोगाच्या कार्यालयातून माहिती मिळाली आहे. महापालिका निवडणुका घेण्यासाठी तीन महिन्याचा वेळ लागणार आहे. त्यामुळे तुर्तास कोणत्याही महापालिकेच्या निवडणुका होण्याची शक्यता नाही.

विधानसभा निवडणुकीनंतर आता आगामी महानगरपालिका निवडणुकीचे वारे वाहायला सुरुवात झाली आहे. याच पार्श्वभूमीवर संजय राऊतांनी पालिका निवडणुकीत स्वबळावर लढण्याचे संकेत दिले आहेत. स्वतंत्र लढून कार्यकर्त्यांना बळ दिलं पाहिजे, असं वक्तव्यही संजय राऊतांनी केलं होतं. दरम्यान यानंतर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे. यावर विजय वडेट्टीवारांनी ठाकरे गट स्वबळावर असेल तर आम्ही देखील वेगळं लढणार, असे विधान केले आहे.

मुंबई पालिकेच्या निवडणुका एकत्र लढणार – एकनाथ शिंदे

निवडणुका स्वबळावर लढायच्या की, एकत्र याचा निर्णय उद्धव ठाकरे घेतील अशी प्रतिक्रिया सुषमा अंधारेंनी दिली आहे. दरम्यान आगामी निवडणुका या ठाकरे गटासाठी पैसे खाण्याची शेवटची संधी असल्याचं म्हणत संजय शिरसाटांनी ठाकरे गटावर टीका केली आहे. एकीकडे मविआत संजय राऊतांच्या विधानानंतर काँग्रेसनंही आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढण्याचा इशारा दिला आहे. तर दुसरीकडे महायुती म्हणून मुंबई पालिकेच्या निवडणुका एकत्र लढणार असल्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी म्हटलं आहे.

मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका महायुती म्हणून एकत्र लढू, असे एकनाथ शिंदेंनी म्हटले आहे. विधानसभा निवडणुकींनंतर स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीची जोरदार चर्चा सुरु आहे. यामुळे येत्या एप्रिलनंतर महानगरपालिकेच्या निवडणुका पार पडणार आहेत.

…तर निवडणुकींचा मार्ग मोकळा होणार

येत्या 22 जानेवारीला स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीसंदर्भात सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार असल्याची माहिती समोर येत आहे. सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या निकालानंतर किमान दोन ते तीन महिन्यांचा कालावधी निवडणुकीसाठी लागणार आहे. पालिकेत प्रभाग रचना, सदस्यांची संख्या यानुसार राज्य निवडणूक आयोग निवडणुकांचा निर्णय घेणार आहे. दरम्यान सुप्रीम कोर्टातील याचिका निकाली निघाल्यास स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींचा मार्ग मोकळा होणार आहे.

विधानसभेनंतर आता आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी मविआ आणि महायुतीकडून जोरदार तयारी सुरु आहे. मात्र, या निवडणुका मविआ एकत्र लढणार का वेगळ्या हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;