शरद पवार आणि अजितदादा पुन्हा एकत्र येणार?; शिंदे गटातून पहिली प्रतिक्रिया काय?

शरद पवार आणि अजितदादा पुन्हा एकत्र येणार?; शिंदे गटातून पहिली प्रतिक्रिया काय?

माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांचा आज 85 वा वाढदिवस आहे. या निमित्ताने राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शरद पवार यांची भेट घेतली. दोन्ही नेत्यांमध्ये 20 मिनिटे चर्चा झाली. काय चर्चा झाली हे गुलदस्त्यात आहे. विशेष म्हणजे दोन्ही नेत्यांनी बऱ्याच महिन्यानंतर एकत्रितपणे चहा, नाश्ता घेतला. त्यामुळे अजितदादा आणि शरद पवार एकत्र येणार असल्याची पुन्हा एकदा चर्चा रंगली आहे. त्यावर शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांची पहिली प्रतिक्रिया आली आहे. भविष्यात काय घडेल काहीच सांगता येत नाही, अशी सूचक प्रतिक्रिया संजय शिरसाट यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे अजितदादा आणि शरद पवार एकत्र येण्याच्या चर्चांना अधिकच उधाण आलं आहे.

शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी मीडियाशी संवाद साधताना ही प्रतिक्रिया दिली आहे. अजित दादा हे शरद पवार यांना भेटल्याने शिवसेनेची कोंडी होणार नाही. ही कौटुंबिक भेट असेल तर ठिक. पण जाणकार म्हणतात की, शरद पवार आणि अजित पवार येत्या काळात एकत्र येतील. भविष्यात काय घडेल माहीत नाही. पण त्यांना शुभेच्छा. समोरच्याला कंफ्युझ्ड ठेवण्याचा त्यांचा गुण आहे. भविष्यात कोण कुणासोबत जाणार हे पहावं लागेल, असं संजय शिरसाट म्हणाले.

पण शरद पवार कळाले नाही

शरद पवार यांच्याकडे मोठं नेतृत्व गुण आहे. त्यांनी एकखांबी राजकारण फिरवलंय. पण शरद पवार कळाले नाहीत. चांगल्या कामात आणि वाईट कामात शरद पवारांचा हात असतो. शरद पवारांना आमच्या शुभेच्छा. त्यांनी दीपस्तंभाप्रमाणे काम करावं, असं शिरसाट यांनी सांगितलं.

महत्त्व कमी होणार नाही

महायुतीत आमचं महत्व कमी होणार नाही. आम्हाला राष्ट्रवादीपासून कोणताही धोका नाही. ते पक्षासाठी काम करतात. आम्हीही आमच्या पक्षासाठी काम करतो. आमचा आलेख वरचढ आहे. आम्ही लढणारे लोक आहोत, असं त्यांनी स्पष्ट केलं.

महत्त्वाच्या घडामोडी

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज असल्याच्या चर्चा आहेत. त्यावरही त्यांनी भाष्य केलं. एकनाथ शिंदे नाराज नाहीत. ते दिल्लीला जाणार नाही. आज संध्याकाळी बैठक होईल. तिथला काय निरोप आहे हे कळेल. खातेवाटप आणि मंत्रिमंडळाचे फॉर्म्युले ठरलेले असावेत. विस्तार होईल. आज संध्याकाळी बैठक होईल. महत्वाची घडामोड उघड होईल, असंही त्यांनी सांगितलं.

शांतता राखा

परभणीत जे घडलं ते दुर्दैवी आहे. या प्रकरणातील माथेफिरू अटकेत आहे. समाजात दुही पसरेल असं कृत्य करू नये. शांतता राखा, परिस्थिती चिघळतेय. राज्यात गुन्हेगारी वाढत असेल तर सरकारही गंभीर आहे. बीडमध्ये जे काही घडलं त्यात सरकार आरोपींवर कठोर कारवाई करणार. कुणाला पाठीशी घालणार नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;