विधानसभेतून सावरकरांचा फोटो हटवणार, काँग्रेसचा धक्कादायक निर्णय, स्वातंत्र्यवीरांच्या पणतूपासून ते बावनकुळेंपर्यंत निषेधाचा सूर

विधानसभेतून सावरकरांचा फोटो हटवणार, काँग्रेसचा धक्कादायक निर्णय, स्वातंत्र्यवीरांच्या पणतूपासून ते बावनकुळेंपर्यंत निषेधाचा सूर

कर्नाटकमधील सिद्धरमैया यांच्या नेतृत्वातील सरकारनं मोठा निर्णय घेतला आहे. काँग्रेसकडून कर्नाटकच्या विधानसभेत असलेला स्वातंत्र्यवीर सावरकरांचा फोटो हटवण्यात येणार आहे. यावरून आता पुन्हा एकदा नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. राजकारण चांगलंच तापलं आहे. यावरून सावरकरांचे पणतू रणजित सावरकर आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरमैया यांच्या नेतृत्वातील काँग्रेस सरकारनं बेळगावच्या सुवर्ण सौधा विधानसभेतून वीर सावरकरांचा फोटो हटवण्याचा निर्णय घेतला आहे. वीर सावरकर यांचं कर्नाटकसाठी कोणतंही योगदान नाही असं सरकारला वाटत असल्यामुळे त्यांनी हा निर्णय घेतल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. बसवराज बोम्मई यांच्या नेतृत्वातील सरकारनं विधानसभेत सावरकरांचा हा फोटो लावला होता. दरम्यान यावरून सावरकर यांचे पणतू रणजित सावरकर यांनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला आहे.रणजित सावरकर यांनी यावेळी बोलताना म्हटलं की काँग्रेसकडून या पेक्षा काही वेगळी अपेक्षा नव्हती. मात्र या निर्णयाची त्यांना मोठी किंमत चुकवावी लागेल.काँग्रेस फक्त टिपू सुल्तान यांचं कौतुक करते असं रणजित सावरकर यांनी म्हटलं आहे.

दरम्यान यावरून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी देखील काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला आहे. त्यांनी ट्विट करत काँग्रेसवर निशाणा साधला आहे,’कर्नाटकातील काँग्रेस सरकारनं विधानसभा सभागृहातून स्वातंत्र्यवीर सावरकर यांची प्रतिमा काढून टाकण्याचा निर्णय घेतला.हा निर्णय अत्यंत निंदनीय आणि भारतीय स्वातंत्र्य चळवळीचा अपमान करणारा आहे.स्वातंत्र्यवीर सावरकरांनी भारतमातेच्या स्वातंत्र्यासाठी भोगलेल्या यातना, त्यांचे बलिदान आणि त्यांचे विचार यांची अवेहलना करण्याचा काँग्रेसचा हा डाव आहे. सत्तेसाठी लाचार झालेले आणि मतांसाठी हिंदुत्ववादी भूमिका सोडलेले उद्धव ठाकरे याचा निषेध करणार की नेहमीप्रमाणे मूग गिळून गप्प बसणार? काँग्रेससोबत आघाडी करताना ठाकरे यांनी सावरकरांच्या विचारांना मूठमाती दिली आहे. त्यामुळेच आज त्यांना ‘टीपू सेना’ म्हणण्याची वेळ आली आहे.स्वातंत्र्यवीर सावरकरांचे विचार अमर आहेत, त्यांचा अपमान करणाऱ्या काँग्रेस आणि त्यांच्या साथीदारांना इतिहास कधीही माफ करणार नाही.’असं ट्विट बावनकुळे यांनी केलं आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;