ईव्हीएम घोटाळ्यावर शंका आहे का? शरद पवार यांचं सर्वात मोठं विधान काय?

ईव्हीएम घोटाळ्यावर शंका आहे का? शरद पवार यांचं सर्वात मोठं विधान काय?

राज्यात अखेर निकाल लागल्यानंतर १२ दिवसांनी महायुतीचे सरकार स्थानापन्न झाले आहे. परंतू या निवडणकीतून काटे की टक्कर होणार असे सर्व एक्झिट पोल आणि जाणकारांनी सांगितले होते, तसे काही घडलेले नाही. महायुतीला एकतर्फी विजय मिळाला आहे. भाजपाला एकट्याला १३२ तर महायुतीला २३५ च्या पुढे जागा मिळाल्या आहेत. तर महाविकास आघाडीचा खेळ ५० च्या आतच आटोपला आहे.  त्यामुळे हा निकाल संशयास्पद असल्याचे विरोधकांसह अनेक राजकीय विश्लेषक, कार्यकर्ते आणि नेत्यांचेही म्हणणे आहे. सोलापूरच्या माळशिरस येथील मारकडवाडीत अभिरुप मतदान घेण्याचा प्रयत्न स्थानिक ग्रामस्थांनी करण्याचा प्रयत्न सरकारने उधळून लावला आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते शरद पवार यांनी उद्या मारकडवाडीत जाण्याची घोषणा केलेली आहे. या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला आहे.

शरद पवार म्हणाले की राज्यात महायुतीचा धक्कादायक विजय झालेला आहे.आज मी विधानसभेतून थोडी माहिती घेतली. त्यांचं म्हणणं एकच होतं की लोकसभेच्या निवडणुकीवेळी ईव्हीएमची तक्रार नव्हती. मग तुम्ही आता ईव्हीएमची तक्रार का करता? आमचे निरीक्षणानुसार चार निवडणूका झाल्या आहेत. हरियाणात निवडणूका झाल्या तेव्हा आपण तेथे गेलो होतो.तिथेही भाजपाची स्थिती अत्यंत कठीण होते. ते भाजपा अचानक सत्तेत आली. परंचू जम्मू-कश्मीर मध्ये मात्र फारुख अब्दुल्ला आले. कॉंग्रेसला अत्यंत कमी मते मिळाली. महाराष्ट्रात मात्र भाजपला मोठे यश मिळाले असले तरी त्याचवेळी झारखंडमध्ये भाजपचा पराभव झाला आहे. त्यामुळे सत्ताधारी पक्ष हे सांगू शकतात. दोन निवडणुकीत एका ठिकाणी तुम्ही जिंकला, दुसऱ्या ठिकाणी आम्ही जिंकलो. त्यामुळे त्यात ईव्हीएमचा काही संबंध नाही? त्यात एकच चित्र दिसलं मोठी राज्य आहे तिथे भाजप आहे. छोटी राज्य आहेत तिथे अन्य पक्ष निवडून आलेले आहेत असेही शरद पवरा यांनी सांगितले.

गावातील लोकांशी बोलणार

आपण उद्या मारकडवाडीत जातोय.गावातील लोकांशी बोलणार आहोत. उत्तम जानकर काय आणि या ठिकाणचे दोन्ही उमेदवार पाहीले. त्यांच्या सभा देखील पाहिल्या आहेत. गेल्या ४० ते ५० वर्षापासून मी सभा करतोय. यांच्या सभा पाहिल्यावर निकाल य लागणार हे सांगण्यासाठी ज्योतिषाची गरज नाही. वातावरण अनुकूल होतं. पण निकाल अनुकूल नाही. पण जोपर्यंत अधिकृत माहिती नाही तोपर्यंत मी त्यावर बोलणार नाही. ईव्हीएमवर संशय व्यक्त करण्यासाठी माझ्याकडे ऑथेंटिक माहिती नाही. मी फक्त आकडेवारी सांगितली आहे असेही शरद पवार यांनी म्हटले आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;