EVM ला मविआचा कडाडून विरोध; आमदारांनी शपथही घेतली नाही, आदित्य ठाकरे म्हणाले, मारकडवाडीत….

EVM ला मविआचा कडाडून विरोध; आमदारांनी शपथही घेतली नाही, आदित्य ठाकरे म्हणाले, मारकडवाडीत….

यंदाच्या विधानसभा निवडणुकीत अटीतटीची लढत झाली. अनेक संस्थांच्या पोलमध्ये अटीतटीची दिसणारी ही लढत निकालाच्या दिवशी मात्र एकतर्फी झाली. विधानसभेच्या या निवडणुतीत सत्तास्थापनेचा दावा करणाऱ्या महाविकास आघाडीला पराभवाला समोरं जावं लागलं. यंदाच्या या निवडणुकीत दिग्गज नेत्यांचा पराभव झाला. त्यानंतर महाविकास आघाडीकडून ईव्हीएमवर संशय व्यक्त करण्यात आला. याचेच पडसाद आजपासून सुरु झालेल्या विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनात देखील पाहायला मिळाले. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आमदारकीची शपथ घेतली नाही. तर महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून विधिमंडळ परिसरात आंदोलन करण्यात आलं.

राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या निकालावर संशय व्यक्त करण्यात येत आहे. सोलापूरमधील माळशिरस तालुक्यातील मारकडवाडी गावात निवडणुकीच्या निकालानंतर मॉक पोलिंग घेण्याचा निर्णय घेण्यात आला. पण पोलिसांकडून विरोध झाल्यानंतर हे मॉक पोलिंग मागे घेण्यात आलं. यानंतर सर्वत्र चर्चा होऊ लागली आहे. शरद पवार मारकडवाडीला जाणार आहेत. राहुल गांधी देखील या गावात येणार असल्याची माहिती आहे. आज विधिमंडळ परिसरात महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून याबद्दल भूमिका मांडण्यात आली. एखादं सरकार एवढ्या मतांनी निवडून येतं. जल्लोष पाहायला मिळतो. पण राज्यात दिसत नाही. मग प्रश्न हाच पडतो की हे जनतेने दिलेलं बहुमत आहे की ईव्हीएम- निवडणूक आयोगाने दिलेलं बहुमत आहे. तेव्हा मारकडवाडीतील लोकांनी मॉक पोल मागितला. तो होऊ दिला नाही. त्यामुळे जनतेचा मान राखून आम्ही आज शपथ घेत नाही. उद्या आम्ही शपथ घेणार आहोत, असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे.

जितेंद्र आव्हाड काय म्हणाले?

मारकडवाडीत काही लोकांना काल रात्री अटक करण्यात आली आहे. आम्ही जिंकलो आसेल तरी आज शपथ घेणार नाही. या निकालावर महाराष्ट्राचा विश्वास बसत नाही. मारकडवाडीने बॅलेट पेपर वर निवडणुकी घेण्याचा निर्णय घेतला. यात निवडणूक आयोगाचा काय संबध आहे? पोलिसांचा काय संबध आहे? गावाने एखादा निर्णय घेतला तर लोकाशाही पध्दतीने आलेले सरकार वरवंटा पसरवण्याचे काम करत आहे. तर हे सरकार लोकशाही पद्धतीने आले नाही, असं म्हणत जितेंद्र आव्हाड यांनी निवडणूक प्रक्रियेवर संशय व्यक्त केला आहे.

नाना पटोले काय म्हणाले?

वरिष्टांशी बोलून आम्ही निर्णय घेणार आहोत. राज्यातील जनतेचे मत आहे हे सरकार जनमताने आलेले नाही. हे सरकार मतं चोरून आले आहे. सरकारने भूमिका घेतली पाहिजे, मॉक पोलींग होऊ द्यायाला पाहिजे होतं. मारकडवाडीमधील लोकांचं मत, जनभावना समजून घेतली पाहिजे होती, असं नाना पटोले म्हणालेत.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;