‘उद्यापर्यंत थांबू, मग बंद असलेले…’, संजय राऊत यांचा महायुतीला थेट इशारा

‘उद्यापर्यंत थांबू, मग बंद असलेले…’, संजय राऊत यांचा महायुतीला थेट इशारा

महाराष्ट्रातील मुख्यमंत्रीपद आणि सरकार स्थापन करण्याबाबत अजूनही निर्णय होत नाही. विधानसभा निवडणुकीनंतर सरकारचा शपथविधीची कार्यक्रम ठरला. पण मुख्यमंत्री कोण होणार? हे माहीत नाही. यावरुन शिवसेना उबाठा नेते संजय राऊत यांनी सरकारवर जोरदार हल्ला केला आहे. राज्यातील सरकार केवळ गृहमंत्रीपदावरुन थांबलेले नाही. त्याच्या मागे काही वेगळे कारणे आहेत? आता उद्यापर्यंत सर्व उलगडा झाला नाही तर आम्ही आमचे बंद असलेले पुस्तक उघडू, असा थेट इशारा संजय राऊत यांनी महायुतीला दिला आहे.

गृहखाते शिवसेनाला का हवे?

एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला गृहमंत्रीपद का हवे आहे? त्यावर बोलताना संजय राऊत म्हणाले, एकनाथ शिंदे यांना पोलीस यंत्रणा त्यांच्याकडे हवी आहे. त्यांना पोलिसांचा सलाम हवा. दुसऱ्या क्रमांकाचा खाते गृहखाते आहे. ते असल्यास त्यांची आतापर्यंतची सर्व कृत्य झाकली जातील. त्यामुळे ती लोक गृहमंत्रीपदावर अडून बसले आहे. परंतु सरकार स्थापन करण्यास उशीर फक्त गृहमंत्रीपदावरुन होत नाही, त्यामागे इतर काही कारणे आहे. ती आम्हाला माहीत आहे. योग्य वेळी ती जाहीर करु, असे संजय राऊत यांनी म्हटले.

त्यांना खरी शिवसेना नको होती…

एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाबाबत लवचिकता दाखवली, तशी उद्धव ठाकरे यांनी दाखवली नाही? या प्रश्नावर राऊत म्हणाले, एकनाथ शिंदे यांना अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद मिळाले आहे. परंतु भाजपला बाळासाहेब ठाकरे नको होते. मातोश्री नको होते. त्यांना खरी शिवसेना नको होती. त्यांना खरी शिवसेना नष्ट करायची होती. आता तुम्हाला कळले खरे काय आणि खोटे आहे काय, राऊत यांनी म्हटले.

गुलाबराव पाटील यांना प्रत्युत्तर

गुलाबराव पाटील यांनी शिवसेना उबाठाचे दहा आमदार आमच्या संपर्कात असल्याचे म्हटले, त्यावर राऊत यांनी गुलाबराव पाटील यांच्यावर हल्ला केले. ते गुलाबराव पाटील यांना म्हणाले, थोडे दिवस थांबा, तुमचा पक्ष शिल्लक राहील का? हे कळेल. आमच्याकडे राहिलेले कडवट शिवसैनिक आणि निष्ठवंत आहे. तुमचासारखा गाळ आणि पालापोचाळा गेला आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;