राज्यात पुन्हा महायुतीचं सरकार; पीएम मोदींची पहिली प्रतिक्रिया, महाराष्ट्राला दिलं मोठं आश्वासन

राज्यात पुन्हा महायुतीचं सरकार; पीएम मोदींची पहिली प्रतिक्रिया, महाराष्ट्राला दिलं मोठं आश्वासन

विधानसभा निवडणुकीचा निकाल अखेर हाती आला आहे. लोकसभा निवडणुकीत फटका बसलेल्या महायुतीने विधानसभा निवडणुकीत मात्र जोरदार मुसंडी मारली आहे. महायुतीला महाराष्ट्रात स्पष्ट बहुमत मिळालं आहे. तब्बल 230 विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार विजयी झाले आहेत. 132 जागांसह भाजप हा सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. तर शिवसेना शिंदे गटाला 57 जागा मिळाल्या आहेत. राष्ट्रवादी अजित पवार गटाला 41 जागांवर विजय मिळाला आहे. मात्र दुसरीकडे महाविकास आघाडीचा राज्यात मोठा पराभव झाला आहे. मविआला केवळ 45 जागाच मिळाल्या आहेत. या ऐतिहासिक विजयावर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. त्यांनी महाराष्ट्रातील जनतेचे आभार मानले आहेत.

नेमकं काय म्हणाले नरेंद्र मोदी? 

आज महाराष्ट्रात विकासवादाचा विजय झाला आहे. आज महाराष्ट्रात सुशासनाचा विजय झाला आहे. महाराष्ट्रात खऱ्या सामाजिक न्यायाचा विजय झाला आहे. आज महाराष्ट्रात खोटेपणा, धोका यांचा अत्यंत वाईटपद्धतीने पराभव झाला आहे. ज्यांनी विभाजनाचा प्रयत्न केला ते आज हारले. महाराष्ट्रात नकारात्मक राजकारणाचा पराभव झाला आहे. महाराष्ट्राने विकसीत भारताच्या संकल्पाला आणखी मजबूत केलं आहे. आज मी भाजप आणि एनडीएच्या सर्व कार्यकर्त्यांचं अभिनंदन करतो, त्यांना या ऐतिहासिक विजयाच्या शुभेच्छा देतो. मी एकनाथ शिंदे आमचे परममित्र देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचं कौतुक करतो असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.

दरम्यान यावेळी बोलताना त्यांनी शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांंचं नाव न घेता त्यांना जोरदार टोला लगावला आहे. मध्यंतरी काही लोकांनी आम्हाला धोका दिला, राज्यात अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न केला. मात्र महाराष्ट्राने त्यांना आज उत्तर दिलं आहे.  मित्रांनो आज देशाच्या अनेक राज्यातील पोटनिवडणुकीचे देखील निकाल लागले आहेत लोकसभेत आमचं आणखी एक सीट वाढलं आहे. उत्तर प्रदेश, उत्तराखंड आणि राजस्थानने भाजपला खूप सपोर्ट केला आहे. आसामने पुन्हा एकदा भाजपावर विश्वास दाखवला आहे. मध्य प्रदेशमध्ये देखील आम्हाला यश मिळालं आहे. बिहारमध्ये देखील आमचं समर्थन वाढलं आहे. यावरून एक लक्षात येतं की देशाला आता फक्त विकास पाहिजे. मी महाराष्ट्रातील जनतेचे, मात भगिनींचे आणि शेतकऱ्यांचे आभार मानतो. महाराष्ट्र आता विकासाच्या वाटेवर अधिक वेगानं धावेल असं अश्वासन यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलं आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;