Maharashtra Assembly Elections : भाजपला राज्यात अभूतपूर्व यश, गेम नेमका कुठं पलटला? फडणवीसांनी सांगितला तो क्षण

Maharashtra Assembly Elections : भाजपला राज्यात अभूतपूर्व यश, गेम नेमका कुठं पलटला? फडणवीसांनी सांगितला तो क्षण

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे निकाल हाती येत आहेत. 2019 मध्ये विधानसभेची निवडणूक झाल्यानंतर राज्यातील दोन प्रमुख पक्षात फूट पडली होती. तसेच राज्यात महायुतीचं सरकार आल्यानंतर मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखाली मोठं मराठा आंदोलन उभं राहिलं. या सर्व पार्श्वभूमीवर या निकालाकडे राज्याचंच नाही तर संपूर्ण देशाचं लक्ष लागलं होतं. अखेर आता जवळपास निवडणूक निकालाचं चित्र स्पष्ट झालं आहे. महायुतीला राज्यात स्पष्ट बहुमत मिळताना दिसत आहे, तर महाविकास आघाडीची प्रचंड पिछेहाट झाली आहे.

भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला आहे, भाजपचे उमेदवार जवळपास 130 जागांवर आघाडीवर आहेत. तर त्यानंतर शिवसेना शिंदे गट 55 जागांवर आघाडीवर आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटानं देखील जोरदार मुसंडी मारली आहे, अजित पवार यांचे उमेदवार 40 जांगावर आघाडीवर आहेत. मात्र दुसरीकडे महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे. महाविकास आघाडी केवळ 50 जागांवर आघाडी आहे.

दरम्यान यावर आता भाजप नेते आणि मुख्यमंत्रिपदाचे प्रबळ दावेदार देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. हा आमच्या एकजुटीचा विजय आहे, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. पुढे बोलताना ते म्हणाले की, महाविकास आघाडीनं आम्हाला ठरवून टार्गेट केलं, जेव्हा एखाद्याला ठरवून टार्गेट केलं जातं तेव्हा ते लोकांच्या लक्षात येतं. त्यामुळे मतदार आमच्या बाजुनं राहिले. यावेळी विरोधकांनी पुन्हा एकदा फेक नॅरेटीव्ह सेट करण्याचा प्रयत्न केला, मात्र यावेळी त्यांचा प्रयत्न फसला. आम्ही अधुनिक अभिमान्यू आहोत, चक्रव्यूह तोडून दाखवला असं फडणवीस यांनी म्हटलं आहे.

आमच्या पक्षानं आमच्या कार्यकर्त्यांनी केवळ भाजपसाठी काम केलं नाही तर महायुतीमध्ये जेवढे मित्र पक्ष होते त्यांच्या उमेदवारांसाठी देखील काम केलं. हा आमच्या एकजुटीचा विजय आहे. लाडक्या बहिणींचे विशेष आभार मानतो. मी महाराष्ट्राच्या जनतेपुढे नतमस्तक आहे. मराठा आणि ओबीसी समाज हा पहिल्यापासून आमच्या पाठिशी आहे, होता आणि राहील. जेपी नड्डा आणि अमित शाह यांचे आभार मानतो. या निकालानं पुन्हा एकदा सिद्ध केलं की राज्यातील जनता ही महाराष्ट्राच्या पाठिशी आहे, असं फडणवीस यांनी म्हटलं आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;