Manoj Jarange : महाराष्ट्रात काय, मराठवाड्यातही मनोज जरांगे फॅक्टरची जादू नाहीच; मराठा आरक्षणाचं काय होणार?

Manoj Jarange : महाराष्ट्रात काय, मराठवाड्यातही मनोज जरांगे फॅक्टरची जादू नाहीच; मराठा आरक्षणाचं काय होणार?

राज्यातच नाही मराठवाड्यामधील निवडणुकीचा कौल पाहता, महायुतीच्या पारड्यात मतदारांनी भरभरून मतदान केल्याचे दिसले. आतापर्यंतची जी आकडेवारी समोर आली ती महाविकास आघाडीचा सुपडा साफ झाल्याचे दिसून येते. लाडकी बहीण, एक है तो सेफ है, बटेंगे तो कटेंगे या नाऱ्यांनी हिंदू एकवटल्याचे दिसते. राज्यातच नाही तर मराठवाड्यातही मनोज जरांगे फॅक्टर चालला नसल्याचे या आकडेवारीवरून दिसून येते. मराठवाड्यातील 46 जागांपैकी 36 जागांवर महायुतीने मुसंडी मारली आहे. तर महाविकास आघाडीला केवळ 8 जागांवर गणित जुळवता आले. थोड्याच वेळात चित्र स्पष्ट होईल. पण सध्याचा ट्रेंड हा महाविकास आघाडीच्या विरोधात असल्याचे दिसून आले.

महायुतीसह भाजपाची आघाडी

या कलामध्ये महायुतीने मोठी आघाडी घेतल्याचे दिसून आले. आता आलेल्या आकडेवारीनुसार 128 जागांवर भाजपा आघाडीवर दिसत आहे. तर 58 जागांवर शिंदे सेना पुढे आहे. मराठवाड्यात सुद्धा महाविकास आघाडीचे विजयाचे नगारे वाजत आहेत. मराठवाड्यातील 46 जागांपैकी 35 जागांवर महायुतीने मोठी बाजी मारल्याचे दिसते. तर महाविकास आघाडीला केवळ 10 जागांवर आघाडी असल्याचे समोर येत आहे. विदर्भातील 62 जागांपैकी 45 जागांवर महायुती तर 15 जागांवर महाविकास आघाडी पुढे आहे.

आता मराठा आरक्षणाचं काय होणार?

यापूर्वी मराठा आरक्षणाचा विषयाने राज्यात आक्रमक दिसला. लोकसभेत अनेक ठिकाणी महायुतीचे पानिपत झाले होते. त्यानंतर भाजपा, विशेषतः देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात मनोज जरांगे पाटील यांची टीका सुरू होती. एकवेळ तर त्यांनी उमेदवार जाहीर करण्याची घोषणा केली होती. पण वेळेवर त्यांनी निवडणूक न लढवण्याचे जाहीर केले. त्यानंतर त्यांनी मराठ्यांनी कोणाला मतदान केले हे मला सांगता येणार नाही, असे वक्तव्य केले. निवडून येणाऱ्या कोणत्याही उमेदवाराने बेईमान होऊ नये असे ते म्हणाले होते.

उपोषणासाठी तयार राहा

आता पुढील लढाईसाठी तयार राहण्याचे आवाहन जरांगे पाटील यांनी काल केले. सरकार स्थापन झाले की आपण उपोषणाची घोषणा करणार असल्याचे ते म्हणाले. गावात कुठेही आमरण उपोषण करायचे नाही. तर अंतरवाली सराटीत आमरण उपोषण करायचे असे त्यांनी सांगितले. मराठ्यांनी ज्यांना मतदान केले, त्यांनी समाजाच्या पाठीशी उभे राहण्याचे आवाहन त्यांनी केले. तर महायुतीमधील नेत्यांनी सरकार आले तर त्यांना उपोषण करण्याची गरज पडणार नाही असे वक्तव्य केले होते. एकंदरीत कल पाहता जरांगे फॅक्टर चालला नाही असेच चित्र दिसत आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;