Presidential Rule : राज्यात दबक्या पावलाने राष्ट्रपती राजवटीची चाहुल, विधानसभेचा मुहूर्त कोण साधणार? तीन दिवसांत विजयाचं तोरण कोण बांधणार?

Presidential Rule : राज्यात दबक्या पावलाने राष्ट्रपती राजवटीची चाहुल, विधानसभेचा मुहूर्त कोण साधणार? तीन दिवसांत विजयाचं तोरण कोण बांधणार?

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 Exit Poll च्या अंदाज पंचेत कुणाला लॉटरी लागणार हे स्पष्ट झाले. विविध संस्थांच्या एक्झिट पोलमध्ये महायुती पुन्हा सत्तेत येणार हे भाकीत वर्तवण्यात आले आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडी सुद्धा काँटे की टक्कर देणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. काहींनी अपक्ष आणि बंडखोरांचा टेकू घेतल्याशिवाय या दोन्ही गटांना सत्ता स्थापनेचा मार्क सूकर होणार नाही, असा पण अंदाज वर्तवला आहे. राज्यात 23 नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणुकीचा निकाल समोर येईल. राज्यात जर-तर अशी परिस्थिती निर्माण झाल्यास राष्ट्रपती राजवट लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

26 नोव्हेंबरनंतर राष्ट्रपती राजवट?

26 नोव्हेंबर नंतर राज्यात राष्ट्रपती राजवट लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. महाराष्ट्र विधानसभेची मुदत 26 नोव्हेंबर रोजी संपत आहे. राज्य विधानसभेचा निकाल दोन दिवसांनी 23 नोव्हेंबरला लागणार आहे.या निकालानंतर राजकीय पक्षांच्या वाटाघाटीनंतर नवीन सरकार 26 नोव्हेंबरच्या अगोदर स्थापन होणं अपेक्षित आहे. मात्र, तोपर्यंत महाविकास आघाडी अथवा महायुती सरकार स्थापन करू शकली नाही तर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची शिफारस राज्यपाल केंद्राकडे करू शकतात. यावर आता सर्वच राजकीय पक्षात सुद्धा खल सुरू झाला आहे.

राज्यपालांनी केला दौरा

विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी सप्टेंबर महिन्यात राज्याचा दौरा केला. त्यांनी यावेळी महाराष्ट्र पिंजून काढला. चांदापासून ते बांदापर्यंत पूर्व-पश्चिम आणि उत्तर-दक्षिण असा उभा-आडवा महाराष्ट्र त्यांनी पिंजून काढला. राज्यपाल पदाची सूत्र स्वीकारल्यानंतर त्यांनी महाराष्ट्र दौरा काढला. त्यावेळी सुद्धा त्यांच्या या दौऱ्याचा अन्वयार्थ लावण्यात येत होता. राज्यपालांनी यावेळी जनतेशी संवाद साधला. त्यांच्या भावना जाणून घेतल्या, ही बाब विशेष ठरली होती. त्याचवेळी दोन दिवसात शपथविधी न झाल्यास राज्यपाल राष्ट्रपती राजवटीची शिफारस करण्याची शक्यता अनेक आजी-माजी आमदारांनी, मंत्र्यांनी वर्तवली होती.

सत्तेचा दावा करण्यासाठी अवघे दोन दिवस

विधानसभा निवडणुकीचा निकाल 23 नोव्हेंबर रोजी लागणार आहे. या निवडणुकीत महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाले तर राष्ट्रपती राजवट लागण्याची शक्यता बारगळणार आहे. पण जर काँटे की टक्कर झाली आणि अपक्षांचे पारडे जड झाले तर सत्ता स्थापन करण्यासाठी अवघे दोन दिवस उतरतील. त्यामुळे 24 नोव्हेंबरला शपथविधी आणि 25 तारखेपर्यंत मंत्रिमंडळ गठित करणे आवश्यक आहे. तसे झाले नाही तर राज्यात राष्ट्रपती राजवटीची शक्यता नाकारता येत नाही.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;