Raj Thackeray : वरळीत व्हायरल होणाऱ्या पत्रावर राज ठाकरे स्पष्टपणे बोलले, सत्य काय ते सांगितलं

Raj Thackeray : वरळीत व्हायरल होणाऱ्या पत्रावर राज ठाकरे स्पष्टपणे बोलले, सत्य काय ते सांगितलं

वरळीमध्ये एक पत्र व्हायरल होतय. त्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवाराला पाठिंबा दिल्याचा मजूकर आहे. आज विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत असताना हे पत्र व्हायरल झालय. त्यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे बोलले आहेत. मतदानाचा हक्क बजावल्यानंतर राज ठाकरे पत्रकारांशी बोलले. “मूळात ज्यांच्या पायाखालची जमीन सरकलेली असते, निवडून येण्याच सोडा, पण ज्यांना मत मिळण्याचा विश्वास नसतो, ते अशा गोष्टी करतात. वरळीतील मतदार सूज्ञ आहे. मी असा कोणताही पाठिंबा शिवसेना शिंदे गटाला दिलेला नाही. मतदारांनी यावर विश्वास ठेऊ नये. ही गोष्ट खोटी आहे” असं राज ठाकरे म्हणाले.

निवडणुकीत खूप ओंगळवाणे प्रकार बघायला मिळत आहेत, या पत्रकाराच्या प्रश्नावर राज ठाकरे म्हणाले की, “भयंकर, मी गुढी पाडव्याच्या सभेत आधीच सांगितल होतं की, या निवडणुकीत खूप गोंधळ होतील. विचित्र गोष्टी दिसतील, तसच होतय. कुठल्या गोष्टीचा कोणाला अंदाज येत नाहीय, असे प्रकार करुन काही होणार नाही. बाकीच्यांनी जी माती खायची ती पाच वर्षात खाऊन झाली. लोकं आता भुलणार नाहीत” या निवडणुकीत पैशांचा वापर होतोय यावर राज ठाकरे म्हणाले की, ‘आता जास्त उघडणपणे होतोय’

‘आज कोणीही ठामपणे सांगू शकत नाही, की…’

मतदार मोठ्या संख्येने येत आहेत, युवा वर्ग मतदानाला बाहेर पडतोय, त्यावर ‘मतदानाची टक्केवारी वाढली पाहिजे’ असं राज ठाकरे म्हणाले. “ज्यांनी तुमच्या मताशी प्रतारणा केली, त्यांना शिक्षा दिली पाहिजे. विनोद तावडेंच्या प्रकरणात डिटेल माहिती नाही. कोणतरी कायतरी बोलतं, माहिती घेऊन बोलेन” असं म्हणाले. नेत्यांवर हल्ले होत आहेत, त्यावर राज ठाकरे म्हणाले की, “नेत्यांनी लोकांचा विश्वास गमावला आहे. आज कोणीही ठामपणे सांगू शकत नाही, की गेल्या निवडणुकीत हा कुठे होता, आता कुठे आहे. अशा दल बदलू राजकारणावर लोकांचा राग असणार”

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;