Vinod Tawade : विरारच्या हॉटेलमध्ये 9 लाख आले कुठून? निवडणूक काळात किती रक्कम घेऊन जाऊ शकतात उमेदवार? तुमच्या प्रश्नांचे A टू Z उत्तर

Vinod Tawade : विरारच्या हॉटेलमध्ये 9 लाख आले कुठून? निवडणूक काळात किती रक्कम घेऊन जाऊ शकतात उमेदवार? तुमच्या प्रश्नांचे A टू Z उत्तर

राज्याच्या विधानसभा निवडणुकीसाठी आज सकाळपासून मतदानाला सुरूवात झाली. त्यापूर्वीच मतदारांना अमिषाची ठिणगी पडली. राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनाच नाही तर भाजपाला विरोधकांनी आरोपांनी शब्द बंबाळ केले. भाजपावर चहु बाजूंनी आरोपांच्या फैरी सुरू झाल्या. कारण कॅमेऱ्यात जे समोर आले ते लोकशाहीसाठी लाजिरवाणे होते. बहुजन विकास आघाडीचे क्षितिज ठाकुर आणि हितेंद्र ठाकुर यांनी तावडे यांच्यावर मतदारांना पाच कोटी वाटप करण्याचा आरोप लावला. ज्या हॉटेलमध्ये तावडे होते. तिथे बविआच्या कार्यकर्त्यांनी त्यांना चार तास घेराव घातला. विरार पूर्वमधील विवांता या हॉटेलमध्ये खोली क्रमांक 406 मधून 9 लाख रुपये रोख रक्कम जप्त करण्यात आली. त्यावरून मोठा गदारोळ उडाला. हा हायहोल्टेज ड्रामा उभ्या देशानेच नाही तर जगाने पाहीला.

काय आहे आरोप?

बहुजन विकास आघाडीने विनोद तावडेंवर कॅश ऑन वोटचा आरोप केला. विरारमधील उमेदवार राजन नाईक यांना ते 5 कोटी रुपये देण्यासाठी आल्याचा आरोप त्यांनी केला. ही रक्कम मतदारांना वाटपासाठी आणल्याचा आरोप झाला. यावेळी हॉटेलमधून डायरी सापडल्या. त्यात पैशांच्या नोंदी नावानिशी आढळल्या. यावेळी हॉटेलमधून 9 लाख रुपये हस्तगत करण्यात आले. ही रक्कम कुणाची आहे हे निवडणूक आयोग, पोलीस यंत्रणांनी अद्याप जाहीर केलेले नाही. अर्थात विरोधकांनी ही रक्कम 5 कोटी नव्हे तर 15 कोटी रुपये असल्याचा दावा केला. त्यातील 10 लाख रुपयेच जर समोर आले तर मग हे 14 कोटी 90 लाख गेले तरी कुठे?

आचार संहितेत किती रक्कम बाळगता येते?

आता या गदारोळानंतर आचार संहितेत एखादी व्यक्ती किती रक्कम सोबत घेऊन जाऊ शकते, याची चर्चा सुरू झाली आहे. गरज असेल आणि योग्य कारणासाठी एक रक्कम नागरिकांना नेता येते. पण त्याचा स्त्रोत आणि कशासाठी ही रक्कम नेण्यात येत आहे, त्याची माहिती द्यावी लागते. उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, मध्य प्रदेश सारख्या मोठ्या राज्यातील उमेदवारांना अधिकत्तम 40 लाख रुपये खर्च करता येते. तर छोट्या राज्यातील आणि केंद्र शासित प्रदेश जसे गोवा, मणिपूर, पुद्दुचेरीमध्ये केवळ 28 लाख रुपये खर्च कराता येतो.

किती रक्कम सोबत नेता येते?

निवडणुकीदरम्यान उमेदवारांना किती रक्कम सोबत नेता येते याची चर्चा होत आहे. याविषयीचे मार्गदर्शन तत्त्वाची अंमलबजावणी करण्यात येते. त्यानुसार, एखादी व्यक्ती जवळपास 2 लाख रुपये सोबत नेता येते. इतक्याच रुपयात तो काही खरेदी पण करू शकतो. तो जवळपास 50 हजारांची रोख रक्कम सोबत घेऊन जाऊ शकतो. दोन लाख रुपये असेल तर पोलीस लगेच तुम्हाला अटक करते असे नाही. ही रक्कम कुठून आणि कशासाठी आली. रुग्णालयातील उपचारासाठी ही रक्कम नेत असाल तर त्याची संपूर्ण माहिती द्यावी लागते. ही रक्कम कुठून आणली ते सांगावं लागतं. जर उमेदवाराने निश्चित मर्यादेपेक्षा अधिक रक्कम खर्च केली तर त्याच्यावर लोकप्रतिनिधी कायदा, 1951 मधील कलम 10ए नुसार कारवाई होते. उमेदवारावर 3 वर्षांपर्यंत निवडणूक लढण्यास प्रतिबंध घालण्यात येतो.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;