उद्धव ठाकरे यांचा जयंतरावांना इशारा, ‘सरळ उघडपणे…’

उद्धव ठाकरे यांचा जयंतरावांना इशारा, ‘सरळ उघडपणे…’

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या शेवटच्या दिवशी शिवसेना उबाठा नेते उद्धव ठाकरे यांनी प्रचाराचा धडका लावला. कर्जतमध्ये घेतलेल्या सभेत त्यांनी शिवसेना बंडखोरांवर हल्ला केला. त्याचवेळी शेतकरी कामगार पक्षाचे जयंतराव पाटील यांना इशाराही दिला. आम्ही मदत करतो, तुम्ही मदत करा, असे आवाहनही केले.

काय म्हणाले उद्धव ठाकरे

शेकापाचे जयंतराव तुम्ही विचित्र काम करु नका. आलिबागमध्ये मी माणुसकी दाखवली. तुमच्या कुटुंबासाठी जागा सोडली. त्यानंतर तुम्ही उमेदवारी उरण, पेण, पनवेल, सांगलो या ठिकाणी मागे घेतली नाही. लढायचे तर उघड लढाई करु या, मैत्री करायची तर उघड करु या, असे उद्धव ठाकरे म्हणाले. आम्ही तुम्हाला आलिबागला मदत करतो, तुम्ही इतर ठिकाणी आम्हाला मदत करा. जयवंतराव आता ठरवा महाराष्ट्र द्रोहीला मदत करायची की महाराष्ट्राचा विकास करणाऱ्यांना मदत करायची? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला.

जमीन अदानींना देणार

मी हेलिकॉप्टरने येताना पहिले, प्रचंड मोठे विमानतळ होत आहे. त्यामुळे जमिनीला भाव येतील. जमिनीला भाव आल्यावर अदानींना देणार आहे. तुम्हाला या ठिकाणी रोजगार हवे की नको. तुम्हाला तुमचे प्रश्न सोडवायचे नाही का? मग मशालीशिवाय पर्याय नाही. रायगडमधील चारही जागा निवडून आणा, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

आमदार महेंद्र सदाशिव थोरवे यांच्यावर उद्धव ठाकरे यांनी जोरदार हल्ला केला. ते म्हणाले, चार दिवस राहिले. सुखाने राहा. त्यानंतर विधानभवनाचे दार तुला दिसणार नाही. यापुढे दादागिरी केली तर २३ तारखेनंतर महाविकास आघाडीचे सरकार आणि गद्दार आहे, पाहून घेऊ, काय होईल, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

कोरोना काळात ऑक्सिजन मिळत नव्हते. परंतु मी मुख्यमंत्री म्हणून ताकतीने लढलो. त्यावेळी भाजपवाले पंतप्रधान निधीत मदत करत होते. आता मी मुद्दाम येथे आलो आहे. गद्दाराला गाडायचे आहे, असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी महेंद्र थोरवे यांना टोला लगावला. मी वर्षा बंगला सोडला तेव्हा हा गद्दार हातात दारूचा ग्लास घेऊन नाचत होता. हा आपला आमदार कसा होऊ शकतो? याला खडी फोडायला पाठवतो. मी मुख्यमंत्री होतो हा एक ही काम घेऊन आला नाही. त्यानंतर खोके घेऊन तिकडे गेला.

निवडणूक जवळ आल्यानंतर अनेक पैसेवाले माझ्यावर आले होते. मला उमेदवारी द्या, असे ते म्हणत होते. परंतु मी निष्ठावंतांना उमेदवारी दिली. काही बोलतात ‘बंटगे तो कटेंगे?’ काय हे मी मुख्यमंत्री असताना जाणवले होते का? कोण कापले गेले? आपले सरकार पडल्यावर हे आले आणि उद्योग घेऊन गुजरातला गेले.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;