Devendra Fadnavis : राष्ट्रपती राजवट कुणामुळे लागली? शरद पवार यांचा काय रोल होता?; देवेंद्र फडणवीस यांनी केला आजवर न झालेला गौप्यस्फोट

Devendra Fadnavis : राष्ट्रपती राजवट कुणामुळे लागली? शरद पवार यांचा काय रोल होता?; देवेंद्र फडणवीस यांनी केला आजवर न झालेला गौप्यस्फोट

2109 या वर्षाने राज्यातील राजकारणाला मोठी कलाटणी घडली. या वर्षात अनेक वेगवान घडामोडी घडल्या. अल्पघटिकेचं सरकार अस्तित्वात आलं. त्यापूर्वी राष्ट्रपती राजवट उठवण्यात आली. तर त्यानंतर महाविकास आघाडीच्या सरकारने राज्यालाच नाही तर देशाला राजकारणातील चमत्कार दाखवला. त्यानंतरच्या अडीच वर्षातही राजकारणात अनेक मोठे धक्के बसले. पण या सर्व घडामोडींना कारणीभूत असलेली राष्ट्रपती राजवट कुणामुळे लागू झाली या मुद्यावर आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठा बॉम्बगोळा टाकला आहे.

शरद पवार यांच्यावर निशाणा

गेल्या विधानसभा निवडणुकीनंतर म्हणजे 2019 मध्ये शरद पवार यांनी राज्यपालांना पत्र पाठवले. त्यामुळेच महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू झाली, असा दावा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. हे पत्र आपल्याच कार्यालयात टाईप करण्यात आले, असा दावा फडणवीस यांनी केला. एका मराठी दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हा खुलासा केला आहे.

काय म्हणाले फडणवीस?

” त्यावेळी भाजपाकडे सरकार स्थापन करण्यासाठी पुरेशा जागा नव्हत्या. आम्हाला सरकार स्थापन करता आलं नाही. राज्यपालांनी उद्धव ठाकरे यांच्या नेतृ्त्वाखालील शिवसेनेला सरकार स्थापण्यसाठी बोलावलं. त्यांच्याकडंही बहुमत नव्हतं. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन नेत्यांनी माझी भेट घेतली. राष्ट्रवादी काँग्रेस भाजपासोबत सरकार स्थापन करू इच्छित असल्याचे ते म्हणाले. त्यानंतर लागलीच एक बैठक झाली. त्या बैठकीला मी, अमित शहा, शरद पवार, अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल हे उपस्थित होते. त्या बैठकीत आम्ही सरकार स्थापन करण्याचा निर्णय घेतला होता.” असा गौप्यस्फोट देवेंद्र फडणवीस यांनी केला.

पत्र माझ्या कार्यालयात टाईप केलं

राष्ट्रपती राजवट लागू करावी अशी पवारांची सूचना होती. त्याप्रमाणे या गोष्टी घडल्याचे फडणवीस म्हणाले. राष्ट्रपती राजवट लागू करण्यासाठी शरद पवार यांनी राज्यपालांना दिलेले पत्र हे महत्त्वाचं होतं. ते पत्र आपल्याच कार्यालयात टाईप करण्यात आलं होतं. या पत्रावर स्वाक्षरी करण्यापूर्वी पवारांनी त्यात काही बदल सूचवले होते. आता शरद पवार जर राज्यात राष्ट्रपती राजवट करणे हे त्यांच्या योजनेचा भाग नव्हता असे म्हणत असले तरी त्यांच्या पत्रामुळेच ती लागू झाल्याचा दावा फडणवीस यांनी केला आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;