रवी राजा यांनी काँग्रेस सोडत भाजपमध्ये प्रवेश का केला? वर्षा गायकवाड यांनी नेमकं कारण सांगितलं

रवी राजा यांनी काँग्रेस सोडत भाजपमध्ये प्रवेश का केला? वर्षा गायकवाड यांनी नेमकं कारण सांगितलं

विधानसभा निवडणूक काळात मुंबईत बऱ्याच राजकीय घडामोडी घडत आहेत. माजी नगरसेवक, मुंबई महापालिकेत विरोधी पक्षनेते राहिलेले रवी राजा यांनी काँग्रेस पक्ष सोडला. आज सकाळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांच्या पक्ष प्रवेशावर मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा, खासदार वर्षा गायकवाड यांनी टीव्ही 9 मराठीला प्रतिक्रिया दिली आहे. रवी राजा यांच्याशी आमच्या कुटुंबाचे चांगले संबंध आहेत. पण इतकी वर्ष काँग्रेसमध्ये राहून ते का गेले माहीत नाही. काँग्रेसने त्यांना सगळं काही दिलं. महापालिकेत विरोधी पक्षनेते पद दिलं. इतर महत्वाची पदं दिली. पण तरी देखील ते भाजपमध्ये गेले हे दुर्भाग्यपूर्ण आहे, असं वर्षा गायकवाड म्हणाल्या आहेत.

रवी राजा यांनी काँग्रेस पक्ष का सोडला?

माझ्या कुटुंबावर घराणेशाहीचा आरोप करणं चुकीचं आहे. रवी राजा धारावीमधून कसे लढले असते? ती जागा एससी आहे. त्यांना सायनची जागा हवी होती. ती न मिळाल्याने त्यांनी काँग्रेस पक्ष सोडला. जो योग्य उमेदवार होता. त्याला ही जागा देण्यात आलीये, असं वर्षा गायकवाड म्हणाल्या. रवी राजा यांना कोवीड काळात ज्या नोटीस आल्या आहेत. त्यामुळे त्यांनी काँग्रेस सोडली आहे. भीतीपोटी काँग्रेस सोडली. काँग्रेस मध्ये कुठलेच अंतर्गत कलह नाहीत. मुंबई काँग्रेसमध्ये योग्य पद्धतीने काम सुरू आहे. काहीजण नरेटीव्ह पसरविण्याचं काम करत आहेत, असं गायकवाड म्हणाल्या.

महायुतीतील ओढाताणीवर भाष्य

नवाब मलिकांचा प्रचार फडणवीस करणार का? महायुतीत अंतर्गत धुसफुस सुरू आहे. महायुतीत मुख्यमंत्रिपदासाठी ओढाताण सुरू म्हणून वाक्य सेंसर करण्यास सांगितलं. राहुल गांधींच्या सभेची मोठी तयारी सुरू आहे. सहा नोव्हेंबरला बीकेसीत भव्य सभा होईल. त्याची तयारी सुरु आहे, असं वर्षा गायकवाड म्हणाल्यात.

आशिष शेलारांच्या चौकशीची मागणी

30 ऑक्टोबरला आमची काँग्रेस पक्षाचे वांद्रे पश्चिमचे उमेदवार असिफ झकेरिया यांनी निवडणूक अधिकाऱ्याकडे काही तक्रारी केले आहेत. आशिष शेलार यांच्या प्रतिज्ञापत्रातील फॉर्म नंबर 26 आक्षेप नोंदवले आहेत. आशिष शेलार यांनी स्वतःच्या आणि त्यांच्या पत्नीच्या रियल इस्टेट आणि क्रीडा व्यवसाय संदर्भातील कुठल्याही प्रकारची मालकीची माहिती दिलेली नव्हती. त्यामुळे संपूर्ण प्रकरणाची चौकशी व्हायला हवी, अशी मागणीही वर्षा गायकवाड यांनी केली आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;