आम्ही हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांना जनाब नाही म्हणत, फडणवीसांची ठाकरेंवर टीका

आम्ही हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांना जनाब नाही म्हणत, फडणवीसांची ठाकरेंवर टीका

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली. टीव्ही ९ च्या सत्ता संमेलन या कार्यक्रमात बोलताना त्यांनी म्हटले की, अजित पवारसोबत आल्यानंतर आम्ही लोकं हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांना जनाब नाही म्हणत. ते शरद पवारांच्यासोबत गेल्यावर ते हिंदू म्हणायचं विसरले. जनाब बाळासाहेब म्हणायला लागले. ऊर्दूत कॅलेंडर छापलं. बाकी सोडा, सर्व चालेल पण त्यांच्या कँपेनमध्ये पाकिस्तानचे झेंडे दिसले. आमच्या इथे नाही दिसले. कोणी कुणासोबत गेले तरी कोण कुणाच्या रंगात रंगतं हे महत्त्वाचं आहे. अजित पवार आमच्या रंगात रंगले आणि उद्धव ठाकरे शरद पवार आणि काँग्रेसच्या रंगात रंगले आहेत. अशी टीका त्यांनी केली.

अधिकाऱ्यांवर कारवाई झाली

‘जो स्कॅम आम्ही काढला होता. त्यात २३ एफआयआर दाखल झाले. अनेक अधिकाऱ्यांवर कारवाई झाली. काही आत गेले. काही निलंबित आहे. त्यावेळी अजित पवारांवर आम्ही आरोप केले होते. कारण ते मंत्री होते. ते चुकीचं नव्हतं. मंत्र्याचीही जबाबदारी असतेच. आता ११ ते १२ वर्ष झाले. संपूर्ण चौकशी झाली. ज्यांच्यावर कारवाई व्हायची त्यांच्यावर कारवाई झाली. अडीच वर्ष ते दादांसोबत होते. ते दूर गेले आणि आता ते नाराज झाले आहेत.’

उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना गुन्हे वाढले

‘कोणतीही घटना घडली तर ती सीरिअस आहे. अशा घटना घडू नये ही राज्याची जबाबदारी आहे. घटना घडल्यावर न्याय मिळाला पाहिजे. एनसीबीआरचा डेटा वाचण्याची एक पद्धत आहे. पर लाख लोकसंख्येच्या प्रमाणात किती गुन्हे झाले ते पाहिले जाते. महाराष्ट्र लोकसंख्या जास्त आहे. त्यामुळे कमी लोकसंख्या असलेल्या गोव्याशी तुलना करता येत नाही. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना कोव्हिडच्या काळात गुन्हे वाढले. पोक्सोचे गुन्हे अधिक वाढले होते. कुणाच्या सरकारमध्ये किती गुन्हे वाढले हा प्रश्न नाही. गुन्हे घडल्यानंतर आरोपीला किती पकडले, गुन्हे कमी करण्यासाठी आपण काय करतो हे महत्त्वाचं आहे. मी कोणत्याही आकड्याला घेऊन तुलना करत नाही.’

‘शाळेत अनेक विनयभंगांची प्रकरणे घडत आहे. काही शाळेत शिक्षकांच्या तर काही शाळेत स्टाफच्या माध्यमातून हे प्रकार होत आहे. विद्यार्थ्यांनी बोलावं म्हणून आम्ही एक व्यवस्था केली आहे. शाळेत महिला पोलीस जातात मुलांशी संवाद साधतात. घटना घडू नये. पण घटना घडल्यानंतर त्या दाबल्या तर ते खराब आहे. अशा घटना आल्यावर त्यावर कारवाई झाली पाहिजे.’

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;