‘निष्ठावान आणि वैभव नाईक यांचं समीकरण कसं जमाणार?’ नारायण राणेंनी पुन्हा डिवचलं

‘निष्ठावान आणि वैभव नाईक यांचं समीकरण कसं जमाणार?’ नारायण राणेंनी पुन्हा डिवचलं

भाजप नेते नारायण राणे यांनी महाविकास आघाडी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील विरोधी पक्षांचे उमेदवार यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. ते प्रचारसभेत बोलत होते. महायुतीच्या उमेदवारासाठी प्रचार करावा लागेल अशी परिस्थिती नाही, जिल्ह्यातील तीनही उमेदवार विजयी होणार, महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून येता कामा नये, विरोधी पक्षातील तीनही उमेदवारांचं डिपॉझिट जप्त  झालं पाहिजे असं नारायण राणे यांनी म्हटलं आहे.

नेमकं काय म्हणाले नारायण राणे? 

नारायण राणे यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. महायुतीच्या उमेदवारासाठी प्रचार करावा लागेल अशी परिस्थिती नाही, जिल्ह्यातील तीनही उमेदवार विजयी होणार, महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून येता कामा नये, विरोधी पक्षातील तीनही उमेदवारांचं डिपॉझिट जप्त  झालं पाहिजे असं नारायण राणे यांनी म्हटलं आहे. आमच्या तीनही जागा जिंकणार म्हणजे जिंकणार सगळे मोठे प्रकल्प मी सुरू केले, रस्ते ब्रिज मी सुरू केले. काही बाकी होतं ते रवींद्र चव्हाण यांनी पूर्ण केलं. सगळी काम आमची आहेत, असा दावाही यावेळी नारायण राणे यांनी केला आहे.

दरम्यान यावेळी बोलताना त्यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार वैभव नाईक यांच्यावर देखील जोरदार टीका केली आहे. ते कुडाळचे कॉन्ट्रॅक्टर आहेत. निष्ठावान आणि वैभव नाईक यांचं समीकरण कसं जमाणार? एक दोन वेळा मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर वैभव नाईक आणि परशुराम उपरकर मला दिसले होते, वैभवला प्रवेश करायचा होता मी विरोध केला. सगळीकडे माझ्यावर टीका करतात, उमेदवार राहिले बाजूला. वैभव नाईक आमच्या पालकमंत्र्याजवळ निधी मागायला जायचे मात्र आमचे मंत्री दिलदार आहेत, असं नारायण राणे यांनी म्हटलं आहे.  दरम्यान यावेळी बोलताना त्यांनी राजन तेली आणि संदेश पारकर यांच्यावर देखील जोरदार टीका केली.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;