राज्यातील प्रत्येक मतदार संघात 10 हजार बोगस मतदार…असे षडयंत्र केले…मविआ नेत्यांचा मोठा आरोप

राज्यातील प्रत्येक मतदार संघात 10 हजार बोगस मतदार…असे षडयंत्र केले…मविआ नेत्यांचा मोठा आरोप

राज्यातील प्रत्येक मतदार संघात दहा हजार मतांची फेरफार सुरु आहे. या षडयंत्रामागे भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळेआहे. मूळ मतदारांची नावे कापून इतर राज्यातील लोकांची नावे जोडली गेली आहे. महायुतीच्या या षडयंत्रात राज्यातील काही अधिकारी सहभागी आहेत. यासंदर्भात राज्य निवडणूक आयोगाला आम्ही माहिती दिली. आता मुख्य निवडणूक आयोगाला ईमेल करत आहोत, असे शिवसेना उबाठा नेते खासदार संजय राऊत आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले.

संजय राऊत यांचा मोठा आरोप

संजय राऊत म्हणाले, संविधानाने निवडणूक आयोगाला निष्पक्ष निवडणुका घेण्याचे अधिकार दिले आहे. त्याचं कसं उल्लंघन सुरू आहे, हे समोर दिसून येत आहे. महायुतीला पराभव दिसत आहे. त्यामुळे ते घाबरले आहेत. निवडणुकीत जिंकू शकत नाही, आपण सत्ता गमावतोय या भीतीने देशाचे गृहमंत्री अमित शाह, गृहखात्याच्या अंतर्गत निवडणूक आयोग आहे, त्यांनी एक मोठं कारस्थान केलं आहे. लोकशाही विरोधात केलं आहे, त्याची तक्रार घेऊन कालच महाविकास आघाडीचे नेते निवडणूक आयोगाला भेटले आहे.

मतदार यादीत गोंधळ निर्माण करण्याचं षडयंत्र उघड झालं आहे. प्रत्येक जिल्ह्यात, मतदारसंघात भाजपची टीम कामाला लागली आहे. त्याचे सूत्रधार चंद्रशेखर बावनकुळे आहेत असं दिसतं. हा तांत्रिक मुद्दा असला तरी राज्याच्या भविष्याचा मुद्दा आहे. एवढंच सांगेल हे षडयंत्र उधळू आणि लोकांमध्ये जागृती निर्माण करू. वेळ पडली तर विराट मोर्चा आयोगावर काढू, असा इशारा संजय राऊत यांनी दिला.

नाना पटोले यांचा आरोप

महायुतीला हरण्याच्या भीतीमुळे मूळ मतदारांचं नाव कमी केली गेली आहे. राज्यातील मतदारांचं नाव काढून टाकलं जात आहे. बाहेरच्या राज्यातील छत्तीसगड आणि मध्यप्रदेशातील मतदारांचं आधारकार्ड जोडून १० – १० हजार लोकांची नावे नोंदवले जात आहे. ओरिजनल मतदार हटवले जात आहे. राज्यातील अधिकारी यात सहभागी झाले आहेत. आयोगाला आम्ही माहिती दिली. आज आम्ही मेल करत आहोत, असे नाना पटोले यांनी म्हटले आहे.

झारखंडच्या डीजीची बदली होत असते पण राज्यातील डीजीची बदली करताना अधिकार नाही म्हणून निवडणूक आयोग सांगतो. म्हणजे आयोग मोदींच्या पायाजवळ बसला आहे का? हा प्रश्न आहे. निवडणूक आयोगच पारदर्शक नसेल राज्यातील लोकशाहीचा गळा घोटण्याचं काम आयोगाकडून होत असेल तर कदापी सहन केलं जात नाही. भाजप सत्तेच्या आधारे लोकशाहीचा गळा घोटणार असेल तर जनता खपवून घेणार नाही. आम्ही मेल करणार आहोत. लोकशाहीचा गळा घोटण्याचं काम आयोगाने थांबवलं पाहिजे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;