मुंबईत भाजपच मोठा भाऊ, अजितदादांच्या वाट्याला फक्त तीन जागा?; शिंदे गटाला किती?

मुंबईत भाजपच मोठा भाऊ, अजितदादांच्या वाट्याला फक्त तीन जागा?; शिंदे गटाला किती?

अखेर महायुतीतील मुंबईतील जागा वाटपाचा तिढा सुटला आहे. महायुतीने जागा वाटपाचा एक फॉर्म्युला ठरवला आहे. या फॉर्म्युल्यानुसार मुंबईत भाजपच मोठा भाऊ ठरणार आहे. तर त्याखालोखाल शिंदे गटाला जागा मिळणार आहेत. विशेष म्हणजे शिंदे गटाकडे मुंबईचे जास्त आमदार नसतानाही अधिक जागा मिळवण्यात शिंदे गटाला यश आलं आहे. तर अजितदादा गटाला मुंबईत फक्त तीन जागा देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, महायुतीतील मुंबईतील जागा वाटपाचा तिढा सुटला आहे. नव्या फॉर्म्युल्यानुसार मुंबईतील 36 जागांपैकी भाजप 18 जागांवर लढणार आहे. तर शिंदे गट 15 जागांवर आणि अजितदादा गट अवघ्या तीन जागांवर लढणार आहे. मुंबईत अजितदादांच्या राष्ट्रवादीची फारशी ताकद नाही. त्यामुळे अजितदादा गटाला तीन जागा देण्यात आल्याचं सूत्रांनी सांगितलं. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अजितदादा गट मुंबईतील अणुशक्तीनगर, वांद्रे पूर्व आणि शिवाजीनगर-मानखुर्द या मतदारसंघातून लढणार आहे.

दोन जागा महत्त्वाच्या

नवाब मलिक हे अणुशक्तीनगर विधानसभा मतदारसंघातील आमदार आहेत. तर वांद्रे पूर्व मतदारसंघात झिशान बाबा सिद्दीकी हे आमदार आहेत. त्यामुळे हे दोन्ही मतदारसंघ मिळवण्यात राष्ट्रवादीला यश आलं आहे. तर शिवाजीनगर-मानखुर्द या मतदारसंघात समाजवादी पार्टीचे नेते अबू आजमी हे आमदार आहेत. या मतदारसंघात मुस्लिम आणि दलित मतदार अधिक आहेत. त्यामुळे ही मते अजितदादा यांच्या राष्ट्रवादीला मिळू शकतात, त्यामुळे अजितदादा गटाला हा मतदारसंघ सोडण्यात आल्याचं सांगितलं जात आहे.

महापालिकेचं गणित

दरम्यान, मुंबईतील जागा वाटप करताना महायुतीने दोन गोष्टींवर भर दिल्याचं सांगितलं जात आहे. एक म्हणजे उमेदवारांची निवडून येण्याची क्षमता आणि दुसरी म्हणजे मुंबई महापालिकेच्या निवडणुका. भाजपने मुंबई महापालिकेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून अधिकाधिक जागा आपल्याकडे ठेवण्यात यश मिळवल्याचं सांगितलं जात आहे.

पाच आमदार घरी बसणार?

दरम्यान, लोकसभा निवडणुकीत ज्या आमदारांच्या मतदार संघातून कमी लीड मिळाला अशा आमदारांना घरी बसवण्याचा निर्णय भाजपने घेतला आहे. त्याचाच एक भाग म्हणून राम कदम, पराग शाह, भारती लव्हेकर, तमिल सेल्वन आणि सुनील राणे यांचा पत्ता कापला जाणार असल्याचं सांगितलं जात आहे. राम कदम यांच्या जागेवर मनोज कोटक यांना तिकीट दिलं जाण्याची शक्यता आहे. तर पराग शाह यांच्या जागी प्रकाश मेहता, भारती लव्हेकर यांच्या जागी संजय पांडे, तमिल सेल्वन यांच्या जागी राजश्री शिरवडकर आणि सुनील राणे यांच्या जागी गोपाळ शेट्टी यांना तिकीट दिलं जाणार असून यात दोन माजी खासदारांचा समावेश असल्याचं सूत्रांनी सांगितलं.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;