ईव्हीएमचा घोटाळा असल्याशिवाय हे होऊ शकत नाही, हरियाणा निकालावरुन राऊत यांची टीका

ईव्हीएमचा घोटाळा असल्याशिवाय हे होऊ शकत नाही, हरियाणा निकालावरुन राऊत यांची टीका

दसरा मेळाव्यात बोलताना संजय राऊत यांनी भाजपवर टीका केली. यावेळी संजय राऊतांनी म्हटले की, ‘आदित्य ठाकरे तुम्ही दसरा मेळाव्यात पहिलं भाषण केलं. ही नव्या पर्वाची सुरुवात आहे. मुलाने वडिलांसमोर भाषण केले नाही ही परंपरा आहे. पण तुम्हाला सांगतो आता तुम्ही लहान मुलं नाही. तुम्ही राज्याचे आणि देशाचे नेते आहात. तुम्ही मगाशी लढणार का विचारलं, जेव्हा जेव्हा ठाकऱ्यांच्या तीन पिढ्यांनी आवाहन केलं लढणार का तेव्हा हा महाराष्ट्र फक्त ठाकऱ्यांच्याच मागे राहिला आहे. प्रबोधनकार ठाकरे असतील, बाळासाहेब ठाकरे असतील आणि उद्धव ठाकरे असतील. आता तुम्ही आवाहन केलं आहे. तुमच्या नेतृत्वात महाराष्ट्र लढायला तयार आहे. मशाल हे एनिमी ऑफ डार्क आहे. अंधार दूर करणारी ही मशाल आहे.’

‘निकाल लागला हरियाणात आणि पेडे वाटताय फडणवीस. सकाळी १० पर्यंत काँग्रेस आघाडीला आहे. बारा वाजता भाजपने सरकार बनवलं. जो काँग्रेस पक्ष ७२ जागावर आघाडीवर होता. तो १२ वाजता कसा आघाडीवर येतो. फक्त ०.६ मतांमुळे भाजपला फायदा कसा झाला. हा ईव्हीएमचा घोटाळा असल्याशिवाय हे होऊ शकत नाही. हरियाणात घडलं ते महाराष्ट्रात घडणार नाही. काही लोकं महाराष्ट्र लूटायला आले आहेत. ही लूट वाचवायची असेल तर उद्धव ठाकरे यांच्या हातात सत्ता द्यावी लागेल. कावळ्यांकडे दिला सरकार… अशी घाण या लोकांनी केली आहे.’

‘गुजरातमध्ये दोन लोकं जन्माला आली. औरंगजेब आणि जिना. महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले. महाराष्ट्राला इतिहास आहे बाकीच्यांना भुगोल आहे. धारावीची जमीन मोदी सरकारने अडाणीच्या घशात घातली. महाराष्ट्राची संपत्ती गुजरातला दिलं जातंय. महाराष्ट्राची लूट सुरु होत आहे. महाराष्ट्रातील अनेक बिबळे आता गुजरातला घेऊन चालले आहे. गुजरातला पार्क करायचे आहे. आणखी काय घेऊन जायचं बाकी आहे.’

‘देशातील न्यायव्यवस्था निकली गेली आहे. सरन्यायाधीश मोदींसोबत आरती करत आहेत. सरन्यायाधीश साहेब आपण महाराष्ट्रात जे घटनाबाह्य सरकार आहे ते पाहता आपल्याला झोप कशी लागते असा प्रश्न आम्हाला पडला आहे. आपल्याला जर हे सगळं संपवायचं असेल आणि नवीन पहाट आणायची असेल तर मशाल घराघरात पोहोचवावा लागेल.’

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;