‘पाकिस्तानच्या थोबाडीत मारणारी निवडणूक’, जम्मू-काश्मीरच्या निकालावर देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया

‘पाकिस्तानच्या थोबाडीत मारणारी निवडणूक’, जम्मू-काश्मीरच्या निकालावर देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया

जम्मू-काश्मीर आणि हरियाणा विधानसभा निवडणुकीचे निकाल आज समोर येत आहेत. हरियाणात भाजपला ऐतिहासिक विजय मिळताना दिसत आहे. तर जम्मू-काश्मीरमध्ये भाजप सत्तेत येणार नाही, अशी सध्याची आकडेवारी सांगत आहे. निवडणूक निकालाच्या कलानुसार, जम्मू-काश्मीरमध्ये इंडिया आघाडीचं सरकार स्थापन होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जम्मू-काश्मीरच्या निकालांवरही प्रतिक्रिया दिली आहे. जम्मू-काश्मीरमध्ये जितक्या जागांवर भाजप जिंकत आहे ती देखील ऐतिहासिक जीत असल्याचा दावा भाजपने केला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे.

“मी केवळ हरियाणाचं बोलणार नाही. मला कुणीतरी विचारलं की, जम्मू-काश्मीरमध्ये कुठला पक्ष जिंकला? मी म्हटलं, जम्मू-काश्मीरमध्ये कुठला पक्ष जिंकला हे महत्त्वाचं नाही तर जम्मू-काश्मीरमध्ये भारताची लोकशाही जिंकली आणि भारत जिंकला. कारण जे लोकं म्हणत होते की, कलम 370 हटवल्यानंतर खून की नदीया बहेंगी, त्यांनी येऊन बघावं. जम्मू-काश्मीरमध्ये आम्ही निवडणुका घेतल्या. जगभरातील मोठ्या देशांचे काऊन्सिल जनरल निरीक्षक म्हणून तिथे आले. त्यांनीदेखील सांगितलं की, इतक्या प्रमाणिक निवडणुका आम्ही कधी बघितल्या नाहीत. तशी निवडणूक आपण घेऊन दाखवली”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

“सर्वात महत्त्वाचं काय तर आंतरराष्ट्रीय जगतामध्ये पाकिस्तान जे सांगत होतं की, भारताने जम्मू-काश्मीरमध्ये सेनेच्या माध्यमातून कब्जा केलेला आहे. तिथे लोकशाही नाही. जम्मू-काश्मीर भारताचा भाग नाही, त्या ठिकाणी फेअर निवडणूक होऊ शकत नाही. पाकिस्तानच्या थोबाडीत मारणारी निवडणूक आपण जम्मू-काश्मीरमध्ये घेऊन दाखवली. त्या माध्यमातून पाकिस्तानचा प्रोपेगेंडा संपला आणि जगाने मान्य केलं की, कलम 370 हटवणं योग्य निर्णय आहे आणि जम्मू-काश्मीर हा भारताचा अविभाज्य घटक आहे”, असा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला.

“जम्मू-काश्मीमध्ये सरकार कोणाचं बनतंय ते महत्त्वाचं नाही. आज जो जम्मू-काश्मीर भारताचा अविभाज्य अंग आहे हे जगाने मान्य केलं आहे. हा भारताचा विजय झाला आहे. या दोन्ही राज्यांमध्ये ज्याप्रकारे जनतेने पाठिंबा दिला आहे त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो. आम्ही विजयाने मातणार नाहीत. या विजयाने आणखी नम्रता शिकवली आहे. या विजयाने आमचा आत्मविश्वास वाढवला आहे. जनतेची कामे करुन तुम्हाला वारंवार निवडणूक जिंकता येते हे सिद्ध झालं”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;