महाविकास आघाडीचं जागावाटप कधी जाहीर होणार?; संजय राऊतांनी सांगून टाकलं

महाविकास आघाडीचं जागावाटप कधी जाहीर होणार?; संजय राऊतांनी सांगून टाकलं

महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक तोंडावर आहे. दसऱ्याच्या नंतर आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. अशात दोन्ही आघाड्यांच्या जागावाटपाचं भिजत घोंगडं असल्याचं दिसतंय. महाविकास आघाडीचं जागावाटप कधी जाहीर होणार? असा प्रश्न ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांना विचारण्यात आला. तेव्हा त्यांनी यावर भाष्य केलं आहे. दसऱ्यापूर्वीच महाविकास आघाडीचं जागावाटपाचं चित्र स्पष्ट होईल, असं संजय राऊतांनी सांगितलं आहे. महाविकास आघाडी म्हणून आम्ही एकत्र होतो आहे आणि पुढेही एकत्रच राहणार आहोत, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

जागावाटप कोणत्या मुद्द्यांवर होणार?

जो जिंकेल त्याला जागा दिली जाईल. प्रत्येक निवडणुकीत, प्रत्येक मतदारसंघात लढण्याचं आणि जिंकण्याचं गणित वेगळं असतं. त्यात अनेक फॅक्टर महत्वाचे ठरतात. उमेदवाराची क्षमता काय? पक्षाची क्षमता काय? सामाजिक स्थिती या सगळ्यावर प्रत्येक मतदारसंघाबाबत चर्चा सुरु आहे. त्यामुळे जागावाटपाला थोडा वेळ लागतो आहे. आकड्यांवर जागावाटप झालं असतं तर ते तासाभरात झालं असतं. पण आम्हाला भाजप आणि त्यांच्यासोबतच्या गद्दार गटाचा पराभव करायचा आहे. भ्रष्टाचाराचा आर्थिक ताकदीचा पराभव करायचा आहे. त्यामुळे जागावाटप विचार करून केलं जातंय. दसऱ्याच्या आधी आम्ही जागावाटप करू, असं संजय राऊत म्हणाले.

तीन घटक पक्षाची संपूर्ण चर्चा पूर्ण होईल. त्यानंतर समजेल कोण कुठे लढत आहे आम्ही आकडे याच्यावर बोलतच नाही आहोत. आम्ही सगळे मिळून महाविकास आघाडी म्हणून निवडणूक लढत आहोत. लोकसभेला तेच सूत्र होते विधानसभेला तेच सूत्र असणार आहे. उमेदवाराचे क्षमता काय पक्षाची ताकद याच्यावर प्रत्येक मतदारसंघानुसार चर्चा होईल थोडा वेळ लागतो. आम्हाला भारतीय जनता पक्षाचा आणि त्यांच्याबरोबर असलेल्या गद्दार पक्षाचा पराभव करायचा आहे, असं राऊतांनी सांगितलं आहे.

मोदींच्या दौऱ्यावर टीका

देशाच्या गृहमंत्री येऊन बसले आहेत. प्रधानमंत्री ठाण्यामध्ये येत आहेत. आज घोडबंदर उद्या घांटाळी, परवा कोपरी पाचपाखाडी मग नंतर नौपाड्याला जातील. मग नंतर आमच्याकडे भांडूप गावात जातील. मोदी हे प्रधानमंत्री आहेत ते त्यांनी प्रधानमंत्र्यांसारखं वागायला पाहिजे. सरदार पटेल जागा वाटपायला महाराष्ट्रात येऊन बसायचे का? सरदार पटेल महात्मा गांधी राज्यात एकच सभा घ्यायचे. आमचे जे गृहमंत्री आणि प्रधानमंत्री आहेत. ते गल्ली बोळात फिरत आहेत. तेही देश वाऱ्यावर सोडून… एकच मेट्रोचं सहा वेळा उद्घाटन करत आहेत, असं संजय राऊतांनी मोदींच्या दौऱ्यावर टीका केली आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;