लोकसभा निवडणुकीत एकनाथ शिंदे यांचे हेलिकॉप्टर तपासले गेले नव्हते, आता काय होणार… निवडणूक आयुक्त म्हणाले….

लोकसभा निवडणुकीत एकनाथ शिंदे यांचे हेलिकॉप्टर तपासले गेले नव्हते, आता काय होणार… निवडणूक आयुक्त म्हणाले….

लोकसभा निवडणुकी दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हेलिकॉप्टरची तपासणी झाली नव्हती. त्यावरुन विरोधकांनी गदारोळ केला होता. शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर गंभीर आरोप त्यावेळी केला होता. एकनाथ शिंदे यांनी हेलिकॉप्टरमधून पैसे नेल्याचा आरोप त्यांनी केला होता. या आरोपावरून राज्यभरात बराच गदारोळ झाला. त्यासंदर्भात निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांना शनिवारी प्रश्न विचारण्यात आला. विधानसभा निवडणुकीत कोणाची तपासणी होणार अन् कोणाची होणार नाही? असा प्रश्न निवडणूक आयुक्तांना विचारला. त्यावर ते म्हणाले, विधानसभा निवडणुकीत काही अपवाद सोडून सर्वांची तपासणी करा. कोणाचीही चौकशी करण्याची वेळ आली तर घाबरू नका, असे आम्ही सांगितले आहे.

बदल्या करण्याचे आदेश

अधिकाऱ्यांच्या बदल्यासंदर्भात राजकीय पक्षांनी दोन तक्रारी केल्या आहेत. एक काही व्यक्तीगत अधिकाऱ्यांची नावे घेतली आहे. दुसरे तीन वर्षापेक्षा जास्त काळ झाल्यावर त्याच ठिकाणी असलेले अधिकारी आहे. त्यासंदर्भात निवडणूक आयोगाचे आदेश स्पष्ट आहे. तीन वर्ष किंवा तीन वर्षांपासून अधिक एका ठिकाणी असलेल्यांची तात्काळ बदली करण्यात येणार आहे. यासंदर्भात आम्ही डीजीपीला आदेश दिले आहेत. त्यात कोणाचाही अपवाद होणार नाही. अधिकाऱ्यांबाबत वैयक्तिक तक्रारी आल्या आहेत. लेखी तक्रारी आल्या आहेत. त्यावर आम्ही निर्णय घेणार आहोत, असे राजीव कुमार यांनी म्हटले.

खर्चाची मर्यादा वाढणार का?

विधानसभा निवडणुकीत खर्चाची मर्यादा ४० लाखांची आहे. ती वाढवावी अशी मागणी झाली आहे. खर्चाची ही मर्यादा देशस्तरावर निश्चित केली आहे. ती एका राज्यासाठी होत नाही. दोन ते तीन वर्षांत आम्ही त्याची रिव्ह्यू करतो. सध्या तरी खर्चाची मर्यादा ४० लाखच राहणार असल्याचे निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी सांगितले.

यादीत अजूनही नावे जोडता येणार

चार वेळा आम्ही मतदार याद्या तयार केल्या आहे. लोकसभा निवडणुकीनंतर एक समरी रिव्हिजन केले आहे. ज्या ठिकाणाहून तक्रारी आल्या त्या दूर करण्याचा प्रयत्न केला आहे. तरीही काही नावे राहिली असेल तर अजून वेळ आहे. नावे यादीत जोडू शकतात, असे निवडणूक आयुक्तांनी सांगितले.

हे ही वाचा…

महाराष्ट्रात निवडणुका एका टप्प्यात होणार का? निवडणूक आयोगाने स्पष्टच सांगितले

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;