मुंबईतील दोन जागांसाठी काँग्रेस आणि ठाकरे गटात मतभेद, मविआचं जागावाटप कुठपर्यंत आलं?

मुंबईतील दोन जागांसाठी काँग्रेस आणि ठाकरे गटात मतभेद, मविआचं जागावाटप कुठपर्यंत आलं?

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एक मोठी बातमी समोर येत आहे. महाविकास आघाडीच्या जागावाटपासाठी आतापर्यंत अनेक बैठका पार पडल्या आहेत. या बैठकांमधून जवळपास 80 टक्के जागांबाबत चर्चा झाल्याची माहिती समोर आली होती. महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबईतील जागांकडे नागरिकांचं विशेष लक्ष आहे. कारण मुंबईत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष किती जागांवर लढणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचं गेल्या अडीच वर्षांमध्ये मुख्यमंत्रीपदासह पक्षाचं नाव आणि चिन्ह देखील हिरावलं गेलं आहे. त्यामुळे त्यांच्यासाठी ही निवडणूक जास्त प्रतिष्ठेची आहे. पण ठाकरे गट नेमक्या किती जागांवर लढणार? याबाबत सूत्रांकडून महत्त्वाची माहिती समोर येत आहे. विशेष म्हणजे महाविकास आघाडीत ठाकरे गट आणि काँग्रेस या दोन पक्षांमध्ये मुंबईतील दोन जागांसाठी मतभेद असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

मुंबईतील भायखळा आणि वर्सोवा विधानसभा मतदारसंघांवरुन काँग्रेस आणि ठाकरे गटात मतभेद निर्माण झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. भायखळा आणि वर्सोवाच्या जागांसाठी दोन्ही पक्ष इच्छुक आहेत. काँग्रेस आणि ठाकरे गटाकडून दोन्ही जागांसाठी आपापल्या पक्षाचे उमेदवार देखील निश्चित झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. महाविकास आघाडीत भायखळा आणि वर्सोवा या जागा चर्चेतील महत्त्वाचे मुद्दे आहेत.

ठाकरे गट मुंबईत किती जागांवर लढणार?

महाविकास आघाडीत मुंबईतील एकूण जागांपैकी 2 तृतीयांश जागांवर एकमत झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. पुढील बैठकीत उर्वरित जागांवर वाटाघाटी होणार आहे. तसेच काही जागांची आदलाबदलही होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईतील 36 पैकी 18 ते 20 जागांवर ठाकरे गट लढणार आहे. काँग्रेस 13 ते 14 जागा, तर राष्ट्रवादी शरद पवार गट दोन ते तीन जागा लढणार आहे. तसेच समाजवादी पक्ष एक जागा लढणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

जागावाटपाच्या फॉर्म्युल्यात मुंबईत ठाकरे गट हा मविआतला मोठा भाऊ असण्याची शक्यता आहे. मुंबईच्या जवळपास 30 ते 31 जागांसाठी जागावाटप जवळपास निश्चित झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. तर 5 ते 6 जागांवर निर्णय होणं अजून बाकी आहे. पुढच्या बैठकीत उर्वरित जागांबाबतही अंतिम शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;