तिकडे हिंदुंवर अत्याचार होत असतील तर भारत-बांगलादेश सामना कशासाठी? आदित्य ठाकरेंचा भाजपसह BCCI ला सवाल

तिकडे हिंदुंवर अत्याचार होत असतील तर भारत-बांगलादेश सामना कशासाठी? आदित्य ठाकरेंचा भाजपसह BCCI ला सवाल

टीम इंडिया आणि बांगलादेशमधील कसोटी मालिकेला उद्यापासून (19 सप्टेंबर) सुरूवात होत आहे. कसोटी मालिका सुरू होण्याआधी वादात सापडली आहे. बांगलादेशमध्ये हिंदुंवर अत्याचार होत असल्याचं बातम्यांमधून समजत आहे. हिंदुवर अत्याचार तिकडे होत असतील तर भारत आणि बांगलादेश कसोटी सामने का घेतले जात आहेत? असा सवाल करत ठाकरे गटाचे नेते आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. पत्रकार परिषदेमध्ये आदित्य ठाकरे बोलत होते.

आदित्य ठाकरे काय म्हणाले?

भारत विरुद्ध बांगलादेश सिरीज सुरु होतेय. अनेकांनी मला फोन केले भाजपच्या नेत्यांनी फोन केले. हा खेळ झाला पाहिजे नको यात मला जायचं नाही पण मला परराष्ट्र मंत्रालयातुन माहिती हवीय की बांगलादेश मध्ये काय परिस्थिती होती हे सांगावं. व्हॉटसअप किंवा बातम्या अनेक पाहिल्या. हिंदुवर अत्याचार होतोय असं सर्वत्र दाखवलं जातंय. केंद्र सरकार भाजपचे, BCCI भाजपची, तीच BCCI देशात टेस्ट घेतायत. मग आता हिंदुत्व कुठे गेले? असं म्हणत आदित्य ठाकरे यांनी भाजपवर निशाणा साधला.

भाजपचे नेते पण या संबंधित विचाराधीन आहेत कि आपण काय बोलायचं? परराष्ट्र मंत्रालयाकडून मला माहिती हवी आहे कि दोन महिन्यात परिस्थिती काय होती? परराष्ट्र मंत्रालयाकडून मला माहिती हवी आहे कि दोन महिन्यात परिस्थिती काय होती? मी भूमिका नाही तर परराष्ट्र मंत्रालयाकडून माहिती हवी आहे? खरच हिंदुवर अत्याचार तिकडे झाले आहेत का? याची माहिती द्यावी जर अत्याचार होत असतील तर सामने का घेतले जात आहेत? असा सवासही आदित्य ठाकरेंनी केला आहे.

निवडणूक घेण्याची हिंमत नाही आणि ते आता वन नेशन वन इलेक्शनची बात करतात. ते चार राज्यांची निवडणूक घेता येत नाही. 30 शहरांत निवडणुका घेत येत नाही. कपिल शर्मा कॉमेड शो सारखे हे झालंय. हरायचेच नाही म्हणून निवडणुका घ्यायचेच नाहीत त्यांना असंही आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;